शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेत फेरबदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:29 PM

जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.

अकोला: मोदी लाट संपली, या भ्रमात लोकसभा निवडणूक लढवून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने आता पराभवापासून धडा घेत पक्ष संघटनेत नव्याने चैतन्य निर्माण करण्याची रणनीती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्यासाठी हिदायत पटेल यांच्या रूपाने मुस्लीम उमेदवार देण्याची खेळी काँग्रेसने खेळली होती. या उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांचे मताधिक्य कमी होऊन ते तिसºया क्रमांकावर जातील, असा होरा काँग्रेस नेत्यांचा होता. प्रत्यक्षात मात्र आंबेडकरांनी आपले मताधिक्य वाढवित दुसºया क्रमांकावर झेप घेत काँग्रेसला मागे ढकलले. काँग्रेसच्या हातातून परंपरागत मतेही निसटल्याचे निकालाची आकडेवारी स्पष्ट करते.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असून, पक्ष संघटना कमकुवत ठरत असल्याचा निष्कर्ष यानिमित्ताने काढल्या जात आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी आता दोन्ही काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हिदायत पटेल व महानगर काँगे्रसचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांची त्या-त्या पदावर फेरनिवड करण्यात आली होती. पटेल हे लागोपाठ दुसºया निवडणुकीत पराभूत झाले असून, चौधरी यांच्या विरोधातही नाराजीचा सूर जाहीरपणे प्रकट झाला होता. राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संग्राम गावंडे यांची निवड करण्यात आली आहे तर महानगर अध्यक्षपदी प्रभारी असलेल्या राजू मुलचंदाणी यांना पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली; मात्र लोकसभा निवडणुकीआधी रफीक सिद्दीकी यांना कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. राष्टÑवादी काँग्रेसमध्येही गटबाजी तीव्र असून, लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या बैठका घेण्याची वेळ पक्षावर आली होती, तर एका गटाने नाहक कटकट नको, या उद्देशातून पक्षाच्या होर्डिंग-बॅनरवर एकमेकांचे छायाचित्र न छापण्याची भूमिका घेतली. कार्यक्रमाचा जो आयोजक असेल, त्याने त्यांच्यापुरते छायाचित्र छापावेत, असा अलिखित नियम घालून घेतल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शनिवारी मुंबईत झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीनंतर संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई येथे ७ व ८ जून रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना प्रामुख्याने बोलाविण्यात आले असून, पक्ष संघटना हाच मुद्दा ऐरणीवर राहणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण