शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:03 IST

भविष्यातील पाणीटंचाईबाबत वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच, असा प्रस्ताव पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. वान धरणाचे पाणी सिंचनाला देण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देपाणी वापर संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या सभेत विविध प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  भविष्यातील पाणीटंचाईबाबत वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच, असा प्रस्ताव पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. वान धरणाचे पाणी सिंचनाला देण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सिंचनाचा तिढा सोडवण्यासाठी पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीत विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे, येत्या रब्बी हंगामासाठी धरणाचे पाणी उपलब्ध होईल,या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती तयार करून ठेवली आहे; मात्र जिल्हा आरक्षण समितीने सिंचनासाठी ६.५0 दलघमी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा शेतकर्‍यांनी विविध मार्गांनी विरोध केला होता, तसेच निवेदने दिली होती. शेतकर्‍यांच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी तेल्हारा येथील बैठक ऐनवेळी रद्द करून अकोला येथे ठेवण्यात आली होती. या बैठकीत पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारक यांनी वान धरणासाठी जमिनी दिल्याने या पाण्यावर प्रथम अधिकार शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी न देता सिंचनासाठी देण्याचा आग्रह केला. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता अकोला शहराची पाण्याची मागणी काटेपूर्णा धरणातून पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे अकोला महानगरपालिका व ६४ खेडी ग्रामीण पाणी पुरवठा योजना यांची पर्यायी व्यवस्थाच केवळ वान धरणावरून केलेली आहे. उर्वरित बिगर सिंचन योजनांचा पाणी पुरवठा हा पूर्वीपासून वान धरणावरच आहे,असे स्पष्ट केले. रब्बी हंगाम २0१७-१८ साठी सर्व कालव्यांना पाणी न सोडल्यास कुठल्याही योजनेस पिण्यासाठी पाणी उचल करू देणार नाही,असा इशारा सभेत लाभधारक शेतकर्‍यांनी दिला. सिंचनासाठी पाणी न देता पिण्यासाठी दिल्यास विविध आंदोलने करण्यात येतील, तसेच धरण ताब्यात घेऊन अधिकार्‍यांना धरणावर बांधण्याचा इशारा यावेळी लाभधारकांनी दिला. उपलब्घ पाण्यामध्ये कालव्याच्या शीर्ष भागामध्ये सिंचनाचे नियोजन करता येणे शक्य आहे, असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले; परंतु संपूर्ण कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे,अशी आग्रही मागणी शेतकर्‍यांनी केली, तसेच आरक्षणाबाबत फेरविचार करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना कळवावे,अशी मागणीही यावेळी लाभधारकांनी केली. 

बैठकीत हे ठराव झाले पारित ४भविष्यातील पाणीटंचाईबाबत महानगरपालिका, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी वान धरणावर पिण्याच्या पाण्याचा हक्क न दाखवता स्वतंत्र जलस्रोताची उपाययोजना करावी. ४वान धरणाचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात पाइपलाइनद्वारे सूक्ष्म सिंचन पद्धतीची संरचना उभी करावी. ४अकोट शहर पाणी पुरवठा योजना पर्यायी व्यवस्था पोपटखेड धरणातून करण्याची यावी. तसेच जळगाव जामोद पाणी पुरवठा योजना पर्यायी व्यवस्था सोनाळा आलेवाडी धरणातून करण्यात यावी. ४वान धरण बिगर सिंचन पाणी आरक्षण मुक्त  करावे, ज्यामुळे लाभक्षेत्रातील विहिरींचे पुनर्भरण शक्य होईल. ४जिहा पाणी आरक्षण समितीत कृषी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. ४शेतकर्‍यांना पीक स्वातंत्र्य असल्यामळे हरभरा किंवा कोणत्याही एका पिकाचा आग्रह शासनाचे प्रतिनिधित्व करणार्‍या कुठल्याही संस्थेने धरू नये. 

बाष्पीभवनाएवढे पाणी सिंचनाला वान धरणातील ६.५0 दलघमी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तेवढा वेग बाष्पीभवनाचा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य नसल्याचे शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, विलास ताथोड, नीलेश पाटील, दीपक टोहरे, अनंत तलोकार, सिद्धार्थ तिवाने, अनिल खारोडे, प्रवीण तिवाने, नितीन साबले, संजय साबले व शेतकरी संघटना शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.-

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पWaterपाणी