शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:03 IST

भविष्यातील पाणीटंचाईबाबत वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच, असा प्रस्ताव पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. वान धरणाचे पाणी सिंचनाला देण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देपाणी वापर संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या सभेत विविध प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  भविष्यातील पाणीटंचाईबाबत वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच, असा प्रस्ताव पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. वान धरणाचे पाणी सिंचनाला देण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सिंचनाचा तिढा सोडवण्यासाठी पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीत विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे, येत्या रब्बी हंगामासाठी धरणाचे पाणी उपलब्ध होईल,या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती तयार करून ठेवली आहे; मात्र जिल्हा आरक्षण समितीने सिंचनासाठी ६.५0 दलघमी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा शेतकर्‍यांनी विविध मार्गांनी विरोध केला होता, तसेच निवेदने दिली होती. शेतकर्‍यांच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी तेल्हारा येथील बैठक ऐनवेळी रद्द करून अकोला येथे ठेवण्यात आली होती. या बैठकीत पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारक यांनी वान धरणासाठी जमिनी दिल्याने या पाण्यावर प्रथम अधिकार शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी न देता सिंचनासाठी देण्याचा आग्रह केला. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता अकोला शहराची पाण्याची मागणी काटेपूर्णा धरणातून पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे अकोला महानगरपालिका व ६४ खेडी ग्रामीण पाणी पुरवठा योजना यांची पर्यायी व्यवस्थाच केवळ वान धरणावरून केलेली आहे. उर्वरित बिगर सिंचन योजनांचा पाणी पुरवठा हा पूर्वीपासून वान धरणावरच आहे,असे स्पष्ट केले. रब्बी हंगाम २0१७-१८ साठी सर्व कालव्यांना पाणी न सोडल्यास कुठल्याही योजनेस पिण्यासाठी पाणी उचल करू देणार नाही,असा इशारा सभेत लाभधारक शेतकर्‍यांनी दिला. सिंचनासाठी पाणी न देता पिण्यासाठी दिल्यास विविध आंदोलने करण्यात येतील, तसेच धरण ताब्यात घेऊन अधिकार्‍यांना धरणावर बांधण्याचा इशारा यावेळी लाभधारकांनी दिला. उपलब्घ पाण्यामध्ये कालव्याच्या शीर्ष भागामध्ये सिंचनाचे नियोजन करता येणे शक्य आहे, असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले; परंतु संपूर्ण कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे,अशी आग्रही मागणी शेतकर्‍यांनी केली, तसेच आरक्षणाबाबत फेरविचार करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना कळवावे,अशी मागणीही यावेळी लाभधारकांनी केली. 

बैठकीत हे ठराव झाले पारित ४भविष्यातील पाणीटंचाईबाबत महानगरपालिका, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी वान धरणावर पिण्याच्या पाण्याचा हक्क न दाखवता स्वतंत्र जलस्रोताची उपाययोजना करावी. ४वान धरणाचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात पाइपलाइनद्वारे सूक्ष्म सिंचन पद्धतीची संरचना उभी करावी. ४अकोट शहर पाणी पुरवठा योजना पर्यायी व्यवस्था पोपटखेड धरणातून करण्याची यावी. तसेच जळगाव जामोद पाणी पुरवठा योजना पर्यायी व्यवस्था सोनाळा आलेवाडी धरणातून करण्यात यावी. ४वान धरण बिगर सिंचन पाणी आरक्षण मुक्त  करावे, ज्यामुळे लाभक्षेत्रातील विहिरींचे पुनर्भरण शक्य होईल. ४जिहा पाणी आरक्षण समितीत कृषी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. ४शेतकर्‍यांना पीक स्वातंत्र्य असल्यामळे हरभरा किंवा कोणत्याही एका पिकाचा आग्रह शासनाचे प्रतिनिधित्व करणार्‍या कुठल्याही संस्थेने धरू नये. 

बाष्पीभवनाएवढे पाणी सिंचनाला वान धरणातील ६.५0 दलघमी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तेवढा वेग बाष्पीभवनाचा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य नसल्याचे शेतकरी संघटनेचे नेते ललीत बहाळे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, विलास ताथोड, नीलेश पाटील, दीपक टोहरे, अनंत तलोकार, सिद्धार्थ तिवाने, अनिल खारोडे, प्रवीण तिवाने, नितीन साबले, संजय साबले व शेतकरी संघटना शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.-

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पWaterपाणी