शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शेतकर्‍यांच्या हितार्थ भारिप-बमसंचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:26 AM

अकोट :  शेतकर्‍यांच्या हितार्थ असलेल्या विविध मागण्या घेऊन  भारिप-बहुजन महासंघाचा शेतकरी आक्रोश मोर्चा ६ नोव्हेंबर  रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर  धडकला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. 

ठळक मुद्देआंदोलन : विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकार्‍यांना दिले  निवेदन 

अकोट :  शेतकर्‍यांच्या हितार्थ असलेल्या विविध मागण्या घेऊन  भारिप-बहुजन महासंघाचा शेतकरी आक्रोश मोर्चा ६ नोव्हेंबर  रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर  धडकला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने विविध मागण्यांचे  निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात कर्जमाफी फसवणूक थांबविण्यात  यावी, कृषि पंपांना विनाखंडित वीज पुरवठा देण्यात यावा, कापूस,  सोयाबीन, तूर पिकांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव,  अकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, कृषि पंपांचे वीज बिल  माफ करा, शेतमालाची ऑनलाइन विक्री बंद करा,  क्रिमिलेअरमधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची केलेली  शिफारस रद्द करा, तालुक्यातील खड्डेमय राज्य महामार्ग व रस् त्यांची दुरुस्ती करा, कपाशीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्या,  बोगस बी.टी. कपाशी कंपन्यांवर कारवाई करा, पीक विमा मंजूर  करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी भारिप-बमसंचे  जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जि.प.अध्यक्ष संध्या  वाघोडे, प्रभाकर मानकर, प्रतिभा अवचार, जि.प. उपाध्यक्ष जमीर  पठाण, महिला बालकल्याण सभापती देवका पातोंड, शोभा  शेळके आदींसह भारिप-बमसं कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर,  महिला, युवक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघagitationआंदोलन