शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:11 IST

सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला जिल्ह्यात अयोध्या निकालाचा सन्मान ठेवत नागरिकांनी अभूतपूर्व संयम दाखवित शांतता कायम ठेवली. सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. निकालानंतर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. अकोला शहरासह, जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यासोबतच पोलीस, राजकीय पुढारी तसेच सामाजिक संघटनांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यात शांततेचे वातावरण आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शहरातील पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील पोलीस ठाणे तसेच संवेदनशील ठिकाणांवर भेटी देऊन तपासणी केली. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार, पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त तैनातजिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एसआरपीएफ प्लाटून, ५ आरपीसी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, १ हजारावर होमगार्ड, ३१ स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबी, डीएसबी यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तजिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, अकोट, मूर्तिजापूर या ठिकाणी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शांतता समितीची घेतली बैठकशहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षकांनी शनिवारी शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी काही सदस्यांनी सोशल मीडियावर तसेच समाजकंटकांवर लक्ष ठेवावे तसेच कोणीही फटाके फोडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी, असे सांगितले.शाळा-महाविद्यालयांना सुटी नाहीराज्यातील अनेक जिल्ह्यासह बुलडाणा व वाशिममध्येही शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे; मात्र सलोख्याच्या वातावरणात या निर्णयाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असून, कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली नाही.

टॅग्स :AkolaअकोलाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर