शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:11 PM

सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला जिल्ह्यात अयोध्या निकालाचा सन्मान ठेवत नागरिकांनी अभूतपूर्व संयम दाखवित शांतता कायम ठेवली. सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. निकालानंतर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. अकोला शहरासह, जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यासोबतच पोलीस, राजकीय पुढारी तसेच सामाजिक संघटनांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यात शांततेचे वातावरण आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शहरातील पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील पोलीस ठाणे तसेच संवेदनशील ठिकाणांवर भेटी देऊन तपासणी केली. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार, पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त तैनातजिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एसआरपीएफ प्लाटून, ५ आरपीसी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, १ हजारावर होमगार्ड, ३१ स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबी, डीएसबी यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तजिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, अकोट, मूर्तिजापूर या ठिकाणी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शांतता समितीची घेतली बैठकशहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षकांनी शनिवारी शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी काही सदस्यांनी सोशल मीडियावर तसेच समाजकंटकांवर लक्ष ठेवावे तसेच कोणीही फटाके फोडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी, असे सांगितले.शाळा-महाविद्यालयांना सुटी नाहीराज्यातील अनेक जिल्ह्यासह बुलडाणा व वाशिममध्येही शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे; मात्र सलोख्याच्या वातावरणात या निर्णयाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असून, कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली नाही.

टॅग्स :AkolaअकोलाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर