शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

अंतराळातील प्रवास एक विलक्षण अनुभव

By admin | Published: February 28, 2015 2:08 AM

आनंद घैसास यांचे प्रतिपादन.

अकोला: अंतराळात पहिला मानव जाण्याच्या घटनेला अर्धशतकापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. मात्र त्यानंतरही अंतराळातील जीवनाबाबत माहितीचा अभाव आहे. अंतराळातील प्रवास एक विलक्षण अनुभव असल्याचे प्रतिपादन डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी डॉ. आनंद घैसास यांनी शुक्रवारी येथे केले. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ, भूगोल व भूगर्भशास्त्र विभाग व आम्ही सारे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी डॉ. आनंद घैसास यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. एम. आर. इंगळे, डॉ. गजानन नारे, डॉ. आशिष राऊत, प्रा. दत्ता भारसाकळे उपस्थित होते. प्रास्ताविक व मुख्य वक्त्यांचा परिचय डॉ. गजानन नारे यांनी करून दिला. अंतराळात मानवाला कसे पाठविले जाते, त्या ठिकाणी अंतराळवीर कसे राहतात, काय जेवतात, कसे झोपतात, अंतराळात स्त्रीला गर्भधारणा शक्य आहे का? स्पेसवॉक म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे डॉ. आनंद घैसास यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ४0 शाळांचा समावेश होता. प्रत्येक शाळेतून ५ विद्यार्थी व १ शिक्षक अशी चमू तयार करण्यात आली होती. अंतराळातील जीवन कठीण आहे, जीवनावश्यक साधनांचा अभाव त्या ठिकाणी आहे, किरणोत्सरी घटकांचा पर्यावरणावर परिणाम होत असल्यामुळे हा प्रवास धोकादायक असतो, असे त्यांनी सांगितले. शून्य गुरूत्वाकर्षणावर असलेला अनुभव त्यांनी कथित केला. दिशा कशा ओळखाव्यात, पाण्याखाली काम करण्याचे प्रशिक्षण अंतराळवीरांना मेक्सिकोच्या वाळवंटात दिले जाते, असे त्यांनी सांगितले.