शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातील प्रवास एक विलक्षण अनुभव

By admin | Updated: February 28, 2015 02:08 IST

आनंद घैसास यांचे प्रतिपादन.

अकोला: अंतराळात पहिला मानव जाण्याच्या घटनेला अर्धशतकापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. मात्र त्यानंतरही अंतराळातील जीवनाबाबत माहितीचा अभाव आहे. अंतराळातील प्रवास एक विलक्षण अनुभव असल्याचे प्रतिपादन डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी डॉ. आनंद घैसास यांनी शुक्रवारी येथे केले. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ, भूगोल व भूगर्भशास्त्र विभाग व आम्ही सारे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी डॉ. आनंद घैसास यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. एम. आर. इंगळे, डॉ. गजानन नारे, डॉ. आशिष राऊत, प्रा. दत्ता भारसाकळे उपस्थित होते. प्रास्ताविक व मुख्य वक्त्यांचा परिचय डॉ. गजानन नारे यांनी करून दिला. अंतराळात मानवाला कसे पाठविले जाते, त्या ठिकाणी अंतराळवीर कसे राहतात, काय जेवतात, कसे झोपतात, अंतराळात स्त्रीला गर्भधारणा शक्य आहे का? स्पेसवॉक म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे डॉ. आनंद घैसास यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ४0 शाळांचा समावेश होता. प्रत्येक शाळेतून ५ विद्यार्थी व १ शिक्षक अशी चमू तयार करण्यात आली होती. अंतराळातील जीवन कठीण आहे, जीवनावश्यक साधनांचा अभाव त्या ठिकाणी आहे, किरणोत्सरी घटकांचा पर्यावरणावर परिणाम होत असल्यामुळे हा प्रवास धोकादायक असतो, असे त्यांनी सांगितले. शून्य गुरूत्वाकर्षणावर असलेला अनुभव त्यांनी कथित केला. दिशा कशा ओळखाव्यात, पाण्याखाली काम करण्याचे प्रशिक्षण अंतराळवीरांना मेक्सिकोच्या वाळवंटात दिले जाते, असे त्यांनी सांगितले.