शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आदेश निघाला; चौकशीसाठी उपसमिती कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 11:09 IST

बिंग फुटणार असल्याच्या धास्तीपोटी राजकीय पटलावर ही उपसमितीच रद्द करण्यासाठी पडद्याआडून जोरदार हालचाली झाल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी ११ फेब्रुवारी रोजी पाच आमदारांसह एकूण १० जणांचा समावेश असलेल्या विशेष उपसमितीच्या नियुक्तीचे निर्देश दिले होते. २३ फेब्रुवारी रोजी ही समिती कार्यान्वित करण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे. यादरम्यान, मनपाची चौकशी झाल्यास अनेकांचे बिंग फुटणार असल्याच्या धास्तीपोटी राजकीय पटलावर ही उपसमितीच रद्द करण्यासाठी पडद्याआडून जोरदार हालचाली झाल्याची माहिती आहे.केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत अभियान’अंतर्गत ८७ कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना असो वा ११० कोटीतून निकाली काढल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता झाल्याची परिस्थिती आहे.यासंदर्भात मनपातील शिवसेना, काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने सातत्याने तक्रारी केल्यावरही उपरोक्त दोन्ही योजनेच्या कामात महापालिका प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या स्तरावर कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, हे येथे उल्लेखनीय. यांसह २०१४ मध्ये शहरात फोर-जी सेवेसाठी केबल टाकणाºया मोबाइल कंपनीला प्रशासनाने २०१५ मध्ये सुमारे ३ कोटी रुपये कोणत्या निकषाच्या आधारे माफ केले, हा संशोधनाचा विषय आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ‘जिओ टॅगिंग’न करताच उभारलेल्या १७ हजार शौचालयांच्या बदल्यात २९ कोटींचे देयक अदा केल्याप्रकरणी खुद्द मनपातील सत्तापक्ष भाजपच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यावर दोन वेळा चौकशी समिती गठित झाली असली तरी आजपर्यंतही समितीचा अहवाल प्राप्त नसून, भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेता विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाकडे चौकशीची मागणी लावून धरली असता, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी पाच आमदारांसह एकूण १० जणांचा समावेश असलेल्या विशेष उपसमितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा आदेश जारी केला.

चौकशीसाठी २४ एप्रिलपर्यंत मुदतराज्य शासनाने २३ फेब्रुवारी रोजी मनपाच्या चौकशीसाठी विशेष उपसमितीच्या गठनाचे आदेश जारी केले. समितीला दोन महिन्यांत (२४ एप्रिल) चौकशी पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा लागेल. महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली असताना व घोळांची मालिका लक्षात घेता दोन महिन्यांत चौकशी पूर्ण होईल का, याकडे लक्ष लागले आहे.

घोळ झाल्याची बाब मान्यशहरातील सिमेंट रस्त्यांची अक्षरश: चार-चार महिन्यांत वाट लागली असताना अद्यापही चौकशीचे घोडे नाचविल्या जात आहेत. मनपाला ठेंगा दाखवत मोबाइल कंपन्यांनी शहरात भूमिगत तसेच पथदिव्यांवरून अनधिकृत ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे टाकले. जलवाहिनीचे जाळे टाकणाºया कंत्राटदाराकडून निकष धाब्यावर बसविले जात आहेत. या सर्व बाबींमध्ये घोळ झाल्याचे ११ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या बैठकीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मान्य केले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका