शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:52 IST

उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे.

अकोला: मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जानेवारी २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीने सिटी बस सेवेचा मोठा गाजावाजा केला. त्यावेळी शहरवासीयांच्या सेवेत ३५ बसचा ताफा दाखल होणार होता. ३५ बस तर सोडाच, उण्यापुऱ्या २० बसचा गाडा हाकताना अवघ्या वर्षभराच्या कालावधीत श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या नाकीनऊ आले आहेत. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना मानसिक त्रास होत असताना मनपा प्रशासनाने साधलेली चुप्पी अनेकांना खटकत आहे.मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत २००१-०२ मध्ये अकोलेकरांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला होता. त्यावेळी मनपाच्या स्तरावर शहरात पहिल्यांदा शहर बस सेवा सुरू करण्यात आली होती. एका स्थानिक संस्थेने बस सेवेचा कंत्राट घेतला होता. सुरुवातीला सहा वर्षे ही सेवा अखंड सुरू होती. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बस सेवा कोलमडली. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बस सेवा रुळावर आणण्याचे प्रयत्न केले. अखेर २०१३ पासून ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ३५ शहर बसचा करारनामा तयार करून निविदा प्रकाशित केली असता, ती श्रीकृपा ट्रॅव्हल्सने सादर केली. जानेवारी २०१७ मध्ये अवघ्या पाच बसच्या मदतीने ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी शहरात थातूरमातूर बस सेवा सुरू केली. त्यानंतर १५ बसचा ताफा आणण्यात आला. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधीतच ट्रॅव्हल्सच्या संचालकाने बँकेचे कर्ज फेडल्या जात नसल्याची सबब पुढे करीत मनपासमोर गुडघे टेकले आणि ६ जून २०१९ रोजी बस सेवा बंद केली. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून कर्जाची परतफेड केली जात नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत असला तरी सत्ताधारी भाजप व प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.सुरुवातीपासूनच रडगाणे!मनपाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सची निविदा मंजूर केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये ३५ बसचा ताफा शहरात दाखल होणार होता. पहिल्या टप्प्यात केवळ ५ बस आणण्यात आल्या. त्यासाठी १ जानेवारी २०१७ चा मुहूर्त उजाडला. उर्वरित ३० बस फेबु्रवारी महिन्यात दाखल होतील, असा दावा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केला होता. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनंतर १५ बस आणण्यात आल्या. उर्वरित १५ बस आजपर्यंतही शहरात दाखल झाल्याच नाहीत. तरीही संचालकांनी कर्जाची सबब पुढे करीत बस सेवा बंद केली, हे येथे उल्लेखनीय.अकोलेकरांमध्ये रोषशहर बस वाहतूक सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये सत्ताधारी भाजप तसेच मनपा प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. दोन महिन्यांपासून बंद पडलेली बस सेवा सुरू करण्यासाठी सत्तापक्षासह प्रशासनाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सला विचारणा व निर्देश देणे अपेक्षित होते. तसे होत नसल्यामुळे ही बस सेवा सुरू होणार की नाही, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका