शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

देशात किडनी प्रत्यारोपणाचे ५० वर्ष पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

भारतात पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण २ फेब्रुवारी १९७१ रोजी झाले असून, त्याला आज पाच दशके पूर्ण झाली. राज्यात मुंबई, ...

भारतात पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण २ फेब्रुवारी १९७१ रोजी झाले असून, त्याला आज पाच दशके पूर्ण झाली. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर ही किडनी प्रत्यारोपणाची महत्त्वाची केंद्रे आहेत. मागील ५० वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे किडनी प्रत्याराेपण पूर्वीच्या तुलनेत सोपे झाले, तरी गरजू रुग्णासाठी किडनी उपलब्ध होणे आजही कठीण आहे. २०१६ मध्ये मोहन फाउंडेशनचे डॉ. सुनील श्रोफ यांनी केलेल्या पाहणीनुसार, भारतात दरवर्षी साधारणतः २ लाख २० हजार रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. त्यापैकी फक्त ७,५०० रुग्णांची शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे किडनी दानासाठी जनजागृतीची गरज आहे.

भारतातील किडनी प्रत्यारोपणाचा प्रवास

केईएम मुंबईमधील डॉ. पी. के. सेन यांनी कुत्र्यांवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करून अनुभव संपादन केला. त्यानंतर डॉ. सेन यांच्या चमूने व वाराणशी येथील डॉ. उडुपा यांच्या चमूने १९६५-६६ मध्ये मानवी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली; पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर २ फेब्रुवारी १९७१ रोजी डॉ. मोहन राव व डॉ. जॉनी यांच्या चमूने वेल्लोर येथे भारतातील पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. या चमूने ऑस्ट्रेलियामधून या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले होते.

किडनी प्रत्यारोपणाला आज पाच दशके पूर्ण होत आहे; परंतु समाजात आजही अनेक गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी शासनाच्या विविध योजना असल्याने त्यासाठी येणारा खर्चही कमी आहे. इतर कोणत्याही अवयवाच्या तुलनेत किडनी प्रत्यारोपण सर्वात यशस्वी शस्त्रक्रिया आहे. इतर मोठ्या शहरांप्रमाणेच लहान शहरांमध्येही आज किडनी प्रत्यारोपण शक्य आहे.

डॉ. प्रशांत मुळावकर, मानद सचिव, युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभाग, अकोला