शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

देशात किडनी प्रत्यारोपणाचे ५० वर्ष पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST

भारतात पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण २ फेब्रुवारी १९७१ रोजी झाले असून, त्याला आज पाच दशके पूर्ण झाली. राज्यात मुंबई, ...

भारतात पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण २ फेब्रुवारी १९७१ रोजी झाले असून, त्याला आज पाच दशके पूर्ण झाली. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर ही किडनी प्रत्यारोपणाची महत्त्वाची केंद्रे आहेत. मागील ५० वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे किडनी प्रत्याराेपण पूर्वीच्या तुलनेत सोपे झाले, तरी गरजू रुग्णासाठी किडनी उपलब्ध होणे आजही कठीण आहे. २०१६ मध्ये मोहन फाउंडेशनचे डॉ. सुनील श्रोफ यांनी केलेल्या पाहणीनुसार, भारतात दरवर्षी साधारणतः २ लाख २० हजार रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. त्यापैकी फक्त ७,५०० रुग्णांची शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे किडनी दानासाठी जनजागृतीची गरज आहे.

भारतातील किडनी प्रत्यारोपणाचा प्रवास

केईएम मुंबईमधील डॉ. पी. के. सेन यांनी कुत्र्यांवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करून अनुभव संपादन केला. त्यानंतर डॉ. सेन यांच्या चमूने व वाराणशी येथील डॉ. उडुपा यांच्या चमूने १९६५-६६ मध्ये मानवी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली; पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर २ फेब्रुवारी १९७१ रोजी डॉ. मोहन राव व डॉ. जॉनी यांच्या चमूने वेल्लोर येथे भारतातील पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. या चमूने ऑस्ट्रेलियामधून या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले होते.

किडनी प्रत्यारोपणाला आज पाच दशके पूर्ण होत आहे; परंतु समाजात आजही अनेक गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी शासनाच्या विविध योजना असल्याने त्यासाठी येणारा खर्चही कमी आहे. इतर कोणत्याही अवयवाच्या तुलनेत किडनी प्रत्यारोपण सर्वात यशस्वी शस्त्रक्रिया आहे. इतर मोठ्या शहरांप्रमाणेच लहान शहरांमध्येही आज किडनी प्रत्यारोपण शक्य आहे.

डॉ. प्रशांत मुळावकर, मानद सचिव, युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभाग, अकोला