शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

शेतक-यांची आर्थिक धुसमट थांबणार का?

By अनिल लगड | Published: July 10, 2020 3:14 PM

कोरोनाला रोखण्यास सरकारला अपयश आले आहे. चार महिन्यापासून गावोगावचे आठवडे बाजार बंद आहेत. बाजार समित्याही सुरळीत नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला, धान्य व इतर पिके कशी विकायची? याच चिंतेत शेतकरी आहे. एकंदरीत गेल्या चार महिन्यापासून बिचा-या  शेतकयांची आर्थिक घुसमट होत आहे, हे मात्र नक्की.

विश्लेषण/

गेल्या चार महिन्यापासून कोरोनाचा लॉकडाऊन सुरू आहे. आताही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यास सरकारला अपयश आले आहे. चार महिन्यापासून गावोगावचे आठवडे बाजार बंद आहेत. बाजार समित्याही सुरळीत नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला, धान्य व इतर पिके कशी विकायची? याच चिंतेत शेतकरी आहे. एकंदरीत गेल्या चार महिन्यापासून बिचा-या  शेतकयांची आर्थिक घुसमट होत आहे, हे मात्र नक्की.

लॉकडाऊनचे नियम शिथील होत असले तरी अनेक ठिकाणी भाजीबाजार, बाजार समित्या बंद आहेत. इतर ठिकाणी विक्रीची सोय नसल्याने शेतकरी रस्त्यावर मिळेल त्या किंमतीत शेतीमाल विकत आहे. शेतीमाल विक्रीची तशी व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही. अनेक शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवतात. हा भाजीपाला शेतकरी पुणे, मुंबईसह इतर शहरातील बाजारात विक्रीसाठी पाठवितात. परंतु सध्या माल नेता येत नसल्याने तो जागेवरच सडून जात आहे. त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

राज्यात लॉकडाऊनमुळे १७ लाख लिटर दुधाची विक्री कमी झाली आहे. हॉटेल, रेस्टारंट, मिठाईची दुकाने बंद असल्याने याचाही फटका दूध उत्पादक शेतकºयांनाच मोठ्या प्रमाणात बसला आहे. इतर कडधान्यांचीही विक्री व्यवस्थेची तीच अवस्था आहे. शेतक-यांच्या फळांनाही बाजार नाहीत. लिंबू, संत्रा, आंब्याला भाव नाही. लिंबू तर शेतक-यांना रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.  कांद्याच्या बाबतीतही शेतक-यांची तीच अवस्था आहे. अनेक शेतक-यांनी कांद्याला भाव नसल्याने कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मे महिन्याच्या अखेरीस नाफेडच्या कांदा खरेदी योजनेला सरकारने सुरूवात केली. कोरोनामुळे देशभर संचारबंदी लागू झाली होती. त्यामुळे सर्वत्र बाजारभाव किलोमागे पाच रुपयांच्या खाली आले होते. त्यामुळे शेतकºयांना नाफेडकडून खरेदीच्या अपेक्षा होत्या. मात्र दीड महिन्यानंतर पूर्ण क्षमतेने खरेदी सुरु झालेली नाही़ नाफेडकरिता कृषी उत्पादक कंपनी सात जिल्ह्यामध्ये कांद्याची खरेदी करीत आहे. तरीही कांद्याला अजूनही म्हणावा तसा भाव नाही. 

कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतक-यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यात पावसामुळे कांदा चाळीतच सडण्याची चिन्हे आहेत. अजूनही सरकारने कांदा विक्रीची व्यवस्था उभी केली नाही. परराज्यात कांद्याला मागणी असूनही तो नेण्यास अडचणी आहेत. सध्याही कांद्याला ३ ते ७ रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळत आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादन खर्चही पदरात पडत नाही. पर्यायाने प्रत्येक शेतीमालाच्या शेतकºयाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

शेतक-यांचे कोरोनामुळे झालेले नुकसान पाहता खूप मोठे व कधीही भरुन न निघणारे आहे. अजूनही खरिप हंगामात होणा-या पिकांच्या उत्पादनालाही भविष्यात चांगला भाव मिळेल, याची हमी नाही. पिक कर्जही अनेक शेतक-यांच्या अजूनही पदरात पडलेले नाही. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या शेतक-यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा राज्यसकारने केली. परंतु या कर्जमाफीची अजूनही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने मोठे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. हे शेतकरी नवीन पिक कर्जापासूनही वंचित राहिले आहेत. एकंदरीत शेतकरी विविध समस्येने ग्रासला असून त्याची मोठी आर्थिक धुसमट झाली आहे.  यासाठी सरकारने तातडीने दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याशिवाय शेतक-याच्या दुधाला व कांद्याला सरकारने मोठे अनुदान देऊन आधार देण्याची गरज आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या