शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

साडेनऊशे शाळा खोल्या मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:24 PM

पावसाळा सुरू असल्याने धोकादायक शाळा खोल्यांत वर्ग न भरविण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी जारी केला़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील साडेनऊशे वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे़

अहमदनगर : पावसाळा सुरू असल्याने धोकादायक शाळा खोल्यांत वर्ग न भरविण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी जारी केला़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील साडेनऊशे वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे़ त्यामुळे सदर वर्ग खोल्यांतील विद्यार्थ्यांची मंदिरे, मंगल कार्यालये किंवा ग्रामपंचायतींच्या जागेत पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे़आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिला आहे़ या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने धोकादायक इमारती निर्लेखित करण्यासाठी ज्या शाळांचा प्रस्ताव पाठविला आहे, अशा खोल्यांत विद्यार्थ्यांना न बसविण्याचा आदेश दिला आहे़मागील शैक्षणिक वर्षात निंबोडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ९५९ शाळा खोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे़ उन्हाळ्याच्या सुटीत शाळा खोल्यांची दुरुस्ती झालेली नाही़परिणामी धोकादायक साडेनऊशे शाळा खोल्यांतील मुलांची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे़निंबोडी येथील शाळा खोली कोसळून तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला़ जिल्ह्यात अशी घटना घडू नये, यासाठी जिल्हा परिषदेने बांधकाम विभागामार्फत प्राथमिक शाळांच्या इमारतींची तपासणी केली़ बांधकाम विभागाच्या अहवालानुसार १ हजार ९२ नवीन शाळा खोल्यांची आवश्यकता आहे़ त्यापैकी ४९२ शाळा खोल्या तातडीने बांधण्याची गरज आहे़ उर्वरित ९५९ शाळा खोल्या मोडकळीस आल्या आहेत़त्या पाडून नवीन खोल्या बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे़ शिक्षण विभागाने २९६ खोल्या पाडण्यास मंजुरी दिली आहे़ उर्वरित ६६३ शाळा खोल्यांचे निर्लेखन प्रस्तावित आहेत़ मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांची संख्या मोठी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद