शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

रामदास आठवलेंवर रिपाइं कार्यकर्ते नाराज; कोरेगाव-भीमा घटनेतील आंदोलकांवर अन्याय झाल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 4:38 PM

पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील दंगलीत दलित समाजावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध करणा-या तरूणांवर पोलिसांनी कलम ३०७ व ३९५ अंतर्गत कारवाई करून पुन्हा अन्याय चालविला आहे. राज्यातील हजारो तरूण आजही जेलमध्ये आहेत. या बाबत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाने थेट भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले.भीमा-कोरेगाव घटनेबाबत गायकवाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी नगरमध्ये होणा-या शासकीय कार्यक्रमांत प्रवेश करून या सरकारला काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. या आंदोलनात रिपाइंसह समविचारी संघटना व पक्ष सहभागी होणार आहेत.भीमा-कोरेगावची दंगल ही सरकार पुरस्कृत व पूर्वनियोजित होती. पोलिसांनी योग्य वेळी बंदोबस्त तैनात केला असता तर घटना टळली असती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली. आंदोलन करणा-या तरूण व कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्यांना अटक केली. सुशिक्षित तरूणांवर सरकार गुन्हेगारीचा शिक्का मारत आहे. कोरेगाव-भीमा येथील घटना ही दलित-मराठा वाद नाही. मात्र काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. या घटनेनंतर पक्षाने राज्यस्तरीय मोर्चा आयोजित करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. पक्षात राहून जर विचारांचा कडेलोट होत असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले. कोरेगाव-भीमा या घटनेचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांच्याकडे न ठेवता सुनील रामानंद अथवा कृष्णप्रकाश यांच्याकडे वर्ग करावा अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली.

जिग्नेश मेवानी तरूण नेतृत्व

कुठल्याही चळवळीत विशिष्ट काळानंतर नवीन नेतृत्व उदयाला येत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवानी हा तरूण नेता लोकांमधून निवडून आलेला आहे. त्यामुळे येणा-या काळात मेवानी हे नेतृत्व म्हणून उदयाला येऊ शकतात, असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवले