शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राधाकृष्ण विखे नैराश्येतून बोलतात; त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका : थोरात यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:25 PM

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले.

संगमनेर : संगमनेरात घडलेली घटना दुर्दैवी आहे. असे घडायला नको होते. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली. ती अत्यंत चुकीची आहे. जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कुणीका असेना. त्या पद्धतीने पोलिसांनी, प्रशासनाने काम करावे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरूवारी (दि. ६) संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात घडली होती. या प्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात १० ते १५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर संगमनेरात झालेल्या हल्ल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी महसूलमंत्री थोरात यांच्यांशी संवाद साधला. सर्व प्रशासन यंत्रणा पोलिसांसह काम करते आहे. ते काम नागरिकांच्या हिताकरिता, त्यांच्या आरोग्याकरिता आहे, असेही थोरात म्हणाले.

   राधाकृष्ण विखे काय बोलतात याला फार महत्व देत जाऊ नका. शेवटी ते आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना नैराश्यातून बोलत असतात. जे इथे घडले तसे त्यांच्याकडे काही चुकीचे घडत नाही, असे नाही. शेवटी तो मानवी स्वभाव आहे. नैराश्यातून राधाकृष्ण विखे पाटलांचे बोलणे येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये. असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार संघात संपर्क राहिला नसल्याचे विखे बोलले होते. त्यावर महसूलमंत्री थोरात यांनी पलटवार केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSangamnerसंगमनेर