शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नगर-औरंगाबाद महामार्गावर एस.टी. बसच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 7:17 PM

रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली.

 

नेवासा : रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली. उल्हास कचरू इंगोले (वय ३५, रा.सोनखास.ता.मंगळूरपीर, जि.वाशीम) व परसराम तुकाराम काजळे, (वय ६१ रा.धनगरपुरा.ता.मंगळूरपीर, जि. वाशीम) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एका खाजगी वाहनातून पुणे येथील भिडेवाड्यावरील मशाल मोर्चासाठी भीमराव मंडळीकर, भास्कर साहेबराव मुळे, संतोष दिनकरराव काळे, राहुल अंबादास राऊत, मंगल जयराम लबडे, वाहन चालक सुभाष दौलत चंदनशिवे, भिमराव उल्हास कचरू इंगोले,परसराम तुकाराम काजळे हे गेले होते. कार्यक्रमानंतर परतत असताना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या सर्वांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर बाभूळवेढा शिवारात हॉटेलमध्ये जेवण केले. जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उल्हास कचरू इंगोले, परसराम तुकाराम काजळे हे दोघे लघुशंकेसाठी महामार्ग ओलांडून पलिकडच्या बाजूला जात होते. यावेळी नगरकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया एस.टी.(एम.एच.२०, बी.एल.१७३७) बसने या दोघांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. भीमराव उमाजी मंडळीकर (रा.मंगळूरपीर) यांनी नेवासा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी.बसचालक भाऊसाहेब संताराम थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर