शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

‘राहिलेल्यां’ना मिळणार खरीप अनुदान; ४२ कोटी प्रशासनाला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:58 PM

काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. 

अहमदनगर : मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना आतापर्यंत सुमारे ४०० कोटींचे वाटप झालेले आहे. मात्र यातून काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. अल्प पावसामुळे मागील वर्षीचा खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी नगर जिल्ह्यात शासनाकडून दोन टप्प्यात ४७२ कोटी रूपये प्राप्त झाले होते. दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांकडे वर्ग केले. सर्व तहसीलदारांनी ३१ मार्च २०१८ अखेर सुमारे ४०० कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले. परंतु यातील काही शेतक-यांना तांत्रिक कारणामुळे अनुदान मिळू शकले नाही. यात काही शेतक-यांची बँक खातीच नव्हती, तर काही शेतकºयांची खाती जुळत नव्हती. पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांतील बरेचशे शेतकरी ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात गेल्याने त्यांचे अनुदान वाटप होऊ शकले नाही. परिणामी मार्चअखेर जिल्हा प्रशासनाला ७२ कोटी रूपये शासनाकडे समर्पित करावे लागले. त्यानंतर प्रशासनाने वंचित राहिलेल्या शेतक-यांची माहिती पुन्हा गोळा करून त्यांच्यासाठी ४२ कोटी ९० लाख ७९ हजार रूपये अनुदानाची मागणी शासनाकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. ती रक्कम आता प्राप्त झाली आहे. यात पारनेर, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा, संगमनेर या सहा तालुक्यांतील शेतक-यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १६ कोटी ५३ लाख अनुदान पारनेर, तर १४ कोटी ७८ लाख रूपये पाथर्डी तालुक्यासाठी आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर