शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

धनजंय मुंडेंनी पाचपुतेंची माफी मागावी, अन्यथा श्रीगोंद्यात पाय ठेऊ देणार नाही : भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:47 PM

बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले?

श्रीगोंदा : बीड जिल्हा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून गोरगरिब माणसांच्या जमिनी कवडीमोल भावाने लुटणारे नेते धनजंय मुंडे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसे पवित्र करून घेतले? असा सवाल उपस्थित करत मुंडे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची माफी मागावी. माफी न मागितल्यास धनंजय मुंडेंना श्रीगोंद्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा श्रीगोंद्यातील भाजपा-सेना नेत्यांना दिला आहे.जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रेत धनंजय मुंडे यांनी बबनराव पाचपुते यांचा उल्लेख ‘बबन्या’ असा केला. या बोच-या टीकेचे श्रीगोंद्यात पडसाद उमटले. आजा शुक्रवारी भाजपा-सेना कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देत मुंडे यांच्या विधानाचा निषेध केला.धनंजय मुंडे यांना आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राजकीय दिशा मिळाली. मात्र त्यांच्यांशी विश्वासघात केला. पंकजा मुंडे यांना त्रास देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बेछूट अन बालिश विधाने करून हा पक्ष रसातळाला घातला. विरोधी पक्ष नेते म्हणून अपयश आले म्हणून धनंजय मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आमचे राजकिय दैवत बबनराव पाचपुते सहा वेळा आमदार झाले. तीन वेळा मंत्रीपद तर तीन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भुषविले आहे. त्यामुळे पाचपुतेंवर धनंजय मुंडे यांनी केलेली टिका म्हणजे ‘बुडतीचे पाय डोहाकडे’ असा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर सभापती शहाजी हिरवे, भाऊसाहेब गोरे, संदीप नागवडे, संतोष खेतमाळीस, बापुसाहेब गोरे, प्रतिभा झिटे, दत्तात्रय कोठारे, आबा दांगडे, विनोद होले, बंडू काकडे, रोहीत गायकवाड, बशीर काझी यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेBJPभाजपा