शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक ...

अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक जीवनातील हा टप्पा महत्त्वाचा असून ही परीक्षा हवीच, असे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. मात्र कोरोनामुळे परीक्षा झाली नाही तर अन्य पर्याय काय याबाबत गोंधळ सुरू आहे. पूर्ण वेळ किंवा पूर्ण गुणांची परीक्षा झाली नाही तरी वेळ कमी करून, अभ्यासक्रम कमी करून का होईना परंतु परीक्षा व्हावी असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीची परीक्षा पुढील शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाची असल्याने ऑनलाईन का होईना परंतु परीक्षा झाली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. बारावीचा अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेत कपात करून परीक्षा घ्यावी, असे काहींचे म्हणणे आहे. सर्व विषयांची एकच प्रश्नपत्रिका आणि तीही बहुपर्यायी स्वरूपात तयार करून केवळ एकच दिवसात ऑनलाईन परीक्षा घेऊन मूल्यांकन होऊ शकते, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकंदरीत बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये गोंधळ आहे. अंतिमत: शासन काय निर्णय घेते, यावरच आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे.

------------

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - ६४१२४

शाळा - ४५०

-----------

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात बारावीचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे परीक्षा होणे गरजेचे आहे. ऑफलाईन शक्य नसेल तर ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. यात शाखानिहाय सर्व विषयांची एकच एमसीक्यू पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करून एकाच दिवशी पेपर घ्यावा. त्यावर गुणपत्रिका तयार करता येईल.

- डॉ. प्रा. दत्तात्रय घुंघार्डे, न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेर

-------------

कोणत्याही परिस्थितीत बारावीची परीक्षा व्हावी. ऑफलाईन परीक्षा शक्य नसेल तर ऑनलाईन का होईना परीक्षा घ्यावी. त्यात अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेतही कपात करून परीक्षा शक्य आहे.

- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना

-------------

वर्षभरापासून आम्ही बारावीचा अभ्यास करत आहोत. आता परीक्षा रद्द झाली तर खूप मोठे नुकसान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा महत्वाची आहेच परंतु करिअरच्या दृष्टीने ऑनलाईन का होईना परीक्षा झाली पाहिजे.

- पवन पवार, विद्यार्थी

--------------

सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परीक्षा घेता आली नाही तरी कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षा घ्यावी. पुढील करिअरच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षा रद्द हा पर्याय होऊ शकत नाही.

- अक्षय साबळे, विद्यार्थी