शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
3
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
4
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
5
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
6
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
7
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
8
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
9
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
10
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
11
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
12
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
13
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
14
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
15
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
16
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
18
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
19
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
20
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST

गतवर्षीपेक्षा चार टक्क्याने कमी पाणीसाठा : उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांना ...

गतवर्षीपेक्षा चार टक्क्याने कमी पाणीसाठा : उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने चिंतेचा विषय

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा यंदा चार टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय झाला आहे.

गेल्या वर्षी १९ हजार ६२७ दशलक्ष घनफूट (६६ टक्के) इतका साठा होता, तर यंदा १८ हजार ४५६ दशलक्ष घनफूट (६२ टक्के) साठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. कुकडी लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पिके जगविण्यासाठी येडगाव धरणातून आवर्तन चालू आहे. त्यामुळे कुकडीतील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. हा उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

येडगाव धरण ओव्हरफ्लो झाले होते. आवर्तन सोडल्याने येडगाव धरणात २७ टक्के म्हणजे ५२५ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक राहिला. कुकडीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी माणिकडोह धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येडगाव आवर्तन १ हजार ४०० क्युसेकवरून ५०० क्युसेकवर करण्यात आले आहे. माणिकडोह धरणात ४ हजार ६४५ दशलक्ष घनफूट (४६ टक्के), तर वडज धरणात ७६६ दशलक्ष घनफूट (६५ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

याशिवाय कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणात ११ हजार २८८ दशलक्ष घनफूट (९० टक्केे), तर पिंपळगाव जोगे धरणात १ हजार २३२ दशलक्ष घनफूट (३२ टक्के) इतका पाणीसाठा आहे.

------------

घोड धरण २५ टक्के

घोड नदीवरील घोड धरणात १२०० दशलक्ष घनफूट (२५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. घोडचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोडचाही पाणीसाठा कमी होत आहे.

---------

विसापूरमध्ये पाणी सोडले

विसापूर तलावात अवघे तीन टक्के पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळे येडगावमधून ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे विसापूरच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली आहे; पण विसापूरमधून दररोज बेसुमार पाणीउपसा होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. सीना धरणात ५२७ दशलक्ष घनफूट (२७ टक्के), तर जामखेडच्या खैरी तलावात २५ दशलक्ष घनफूट (५ टक्के) पाणी शिल्लक राहिले आहे.

----------ही तर शेतकऱ्यांची हत्या

कुकडी प्रकल्पातील डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याचे सर्व राजकीय पक्षातील नेते निवडणुकीत भांडवल करतात. निवडणूक झाली की पुणेकरांना खूश ठेवण्यासाठी सत्ताधारी गप्प बसतात. विरोधकही आक्रमक होत नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकारने या बोगद्याच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली होती; पण राज्यात आघाडी सरकार आले आणि बोगद्यात नकारात्मकता सुरू झाली आहे. त्यामुळे आता राजकीय जोडे बाजूला ठेवून तरुणाईने आक्रमक होऊन सत्ताधारी व विरोधी नेत्यांना जाब विचारण्याची गरज आहे, अशी चर्चा तालुक्यात आहे.