शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शगाव मांजरसुंब्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे नुकतीच पोलीस खात्यामार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली. एमआयडीसी ...

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे नुकतीच पोलीस खात्यामार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही योजना कार्यान्वित करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच मंगल कदम होत्या.

यावेळी युवराज आठरे म्हणाले, आजच्या आधुनिक युगात गुन्हेगारही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावात सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. चोरी, दरोड्याची घटना, महिला संदर्भातील गुन्हे, लहान मुले हरविणे, वाहनचोरी, गंभीर अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला, आग आदी घटनांमध्ये वेळेवर मदत मिळण्यास उपयोग होणार आहे. यामध्ये एका टोल फ्री क्रमांकावर सर्व ग्रामस्थांना एकाचवेळी संदेश पोहोचणार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरसुंबा या गावाने सर्वात प्रथम ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच जालिंदर कदम, तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम, माजी उपसरपंच पांडुरंग कदम, भाऊ कदम, कविता वाघमारे, लता वरखडे, बाजीराव वाघमारे, अर्जुन कदम, पोलीस पाटील आदिनाथ मते, ग्रामस्थ उपस्थित होते.

---

मांजरसुंबा हे गाव ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे याठिकाणी खूप पर्यटक भेट देतात. परंतु, बऱ्याचवेळा गुन्हेगारी घटना घडतात. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. -

मंगल कदम,

सरपंच, मांजरसुंबा

---

मांजरसुंबा गावाने यापूर्वी अनेक बक्षिसे मिळविली असून ग्रामसुरक्षा यंत्रणादेखील प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येईल. परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल.

-जालिंदर कदम,

उपसरपंच, मांजरसुंबा

---

पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजसुंबा गावाने सर्वात प्रथम ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. या यंत्रणेमार्फत परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. पोलीस खात्यालाही फार मोठी मदत होईल.

-युवराज आठरे,

सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी