शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहालयातील दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: May 23, 2014 01:27 IST

अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.

अहमदनगर : एम.आय.डी.सी. भागातील स्नेहालयाच्या विशेष बालगृहातील दोन मुले निंबळक येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विकास किशोर ससाणे (वय १४, रा. लाल टाकीनगर ) आणि मयूर संताराम मापारी (वय १३, रा. निफाड, जि. नाशिक) अशी मयत मुलांची नावे आहेत. एम.आय.डी.सी. परिसरात स्नेहालयाचे विशेष बालगृह आहे. या बालगृहात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे पालन-पोषण केले जाते. विकास आणि मयूर ही दोन मुले याच बालगृहात होती. गुरुवारी दुपारी विनापरवाना ती बाहेर पडली आणि थेट निंबळक परिसरात असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेली. तलावात पाण्याचा अंदा ज न आल्याने ती बुडाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी तलावात पाहिले. त्यानंतर त्या मुलांना तलावातून बाहेर काढून नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलांची तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्यात मुलांच्या पालकांनी धाव घेतली आणि संस्थेचे अधीक्षक आणि काळजीवाहक हेच मुलांच्या मृत्युला जबाबदार असल्याचा टाहो फोडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुलांच्या पालकांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात सायंकाळी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासाठी पालक व नातेवाईकांची ठाण्यात गर्दी झाली होती. ————- मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेता येईल. मुलांच्या पालकांनी संस्थेचा निष्काळजीपणाच मुलांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत चौकशी करूनच कारवाई करण्यात येईल. -किरणकुमार बकाले, सहा. पोलीस निरीक्षक बालगृहात सध्या उन्हाळी शिबिर सुरू आहे. दुपारच्यावेळी मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. मुलांची जेवणे झाल्यानंतर त्यांना थोडी मोकळीक दिली जाते. नेमक्या याच काळात दोन मुले शिबिरातून पळून गेली. शिबिर पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन मुले नसल्याचे लक्षात आल्याक्षणीच संस्थेचे काळजीवाहक राजेंद्र वाकचौरे यांनी संस्थेच्या अन्य कर्मचार्‍यांमार्फत मुलांचा शोध घेतला. काही वाटसरुंनी मुले तलावाकडे गेल्याचे सांगितले. तिथे वाकचौरे यांनी चौकशी केली असता तलावात मुले बुडाल्याचे समजले. मुलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात अपयश आले. ग्रामस्थांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये संस्थेचा कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. -वैजनाथ लोहार, अधीक्षक, बालगृह