शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

नेप्ती उपबाजारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

केडगाव : नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात ...

केडगाव : नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लुटमार होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या कांदा चोरीला आळा घालण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कांदा व्यापारी असोसिएशनने केली आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे यांना निवेदन दिले. नेप्ती उपबाजार समितीमध्ये अहमदनगर माथाडी बोर्ड, हमाल पंचायत तसेच बाजार समितीचे परवानाधारक सभासद काम करत आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने शेतकरी मालाचा लिलाव झाल्यानंतर लिलावासाठी सोडण्यात आलेल्या कांद्याच्या गोण्या भरण्याचे काम महिला कामगार करतात. महिला कामगार नेप्ती उपबाजार समितीमध्ये प्रवेश करत असताना आपल्या बरोबर मोकळ्या पिशव्या घेऊन येतात व काम संपल्यानंतर परत जाताना आपल्या बरोबर आणलेल्या पिशव्यांमध्ये कांदे भरून घेऊन जातात. अशा प्रकारे खरेदीदारांनी खरेदी केलेल्या कांद्याची आपल्या सभासदांकडून मोठ्या प्रमाणात लुटमार आणि चोरी होत आहे. स्त्री कामगार हे आपल्याबरोबर आणलेल्या पिशव्यांचा वापर फक्त चोरीसाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चोरी केलेल्या कांद्याची विक्री बाजार समितीत तसेच बाजार समितीच्या आवाराबाहेर करतात. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत बाजार समिती प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण मॉल, कापड दुकान, सराफी दुकानात जाताना आपल्या पिशव्या बाहेर ठेवतो. त्याप्रमाणे सदर महिला कामगारांनी समितीच्या आवारात येताना त्यांच्याकडील पिशव्या गेटवर जमा करणे बंधनकारक करण्यात यावे. या शिवाय त्यांचे कांदा भरण्याचे काम दुपारी २ वाजेपर्यंत संपते. त्यामुळे त्यांना दुपारी ३ नंतर समिती आवारात थांबू देऊ नये, अशी मागणी कांदा व्यापारी असोसिएशनने केली आहे.

----

बाजार समितीतील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून कांदा उतरवून घेण्याची वेळ दिली आहे. व्यापाऱ्यांकडून ती वेळ पाळली जात नाही. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या वेळेतच कांदा उतरवून घेतला तर असे प्रकार घडणार नाहीत.

- अभय भिसे,

सचिव, बाजार समिती नगर