शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख जनतेला टँकरचे पाणी

By admin | Updated: May 23, 2014 01:27 IST

अहमदनगर : २१ मे अखेर जिल्ह्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या वाढत १८५ वर पोहचली आहे. या टँकरव्दारे तीन लाखांहून अधिक जनतेची तहान सरकारी पाण्याच्या टँकरने भागविली जात आहे.

अहमदनगर : २१ मे अखेर जिल्ह्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या वाढत १८५ वर पोहचली आहे. या टँकरव्दारे तीन लाखांहून अधिक जनतेची तहान सरकारी पाण्याच्या टँकरने भागविली जात आहे. महिनाअखेर यात आणखीन वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केलेली आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यंदा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ३७ कोटी ६४ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र, मे महिन्यांत पाण्याची वाढलेली तीव्रता आणि पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पावणेपाच कोटींचा पुरवणी आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या आराखड्यात टँकरसाठी ३२ कोटी ११ लाख, तर पुरवणी आराखड्यात टँकरसाठी ४ कोटी ६४ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला सव्वा लाख जनतेला पाणी पुरवठा करण्यात येत होता. १६ मे पर्यंत हा आकडा अडीच लाखांपर्यंत होता. २० मे नंतर यात वाढ होत तीन लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याचा पुरवठा होत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्यात ४२ आहेत. नगर तालुक्यात ३६, संगमनेर २९, कर्जत १५, शेवगाव आणि जामखेड प्रत्येकी १३ उर्वरित तालुक्यात कमीत एक तर जास्तीत जास्त दहापर्यंत टँकर सुरू आहेत. श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही. या ठिकाणी किमान पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकलेला आहे. जिल्ह्यात २० गावांत पिण्याच्या पाण्यासाठी अथवा सरकारी पाण्याचे टँकर भरण्यासाठी खासगी विहिरी अधिग्रहीत केलेल्या आहेत. राहुरी तालुक्यातील कुरणवाडी योजना वीज ंिबल न भरल्याने पाच दिवस बंद होती. या योजनेला जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्ती फंडातून १७ लाख रुपये देण्यात आले असून त्यामुळे शुक्रवारी योजना सुरू होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यांनी दिली. घोसपुरी योजनेचेही पैसे भरले असल्याचे त्यांनी सांगितले.