शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या गावात सफाई कर्मचारी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

दोन दिवसांपासून राहुरी शहर हद्दीतील नवीपेठ परिसरात असलेल्या भूमिगत गटारीचे साफसफाईचे काम चालू आहे. त्यासाठी खासगी लोकांकडून रोजंदारीवर काम ...

दोन दिवसांपासून राहुरी शहर हद्दीतील नवीपेठ परिसरात असलेल्या भूमिगत गटारीचे साफसफाईचे काम चालू आहे. त्यासाठी खासगी लोकांकडून रोजंदारीवर काम करून घेतले जात आहे. साफ सफाईचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराने सफाई कामगारांना आवश्यक साहित्य पुरवणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदार जास्त फायदा करून घेण्यासाठी कामगारांना कोणतेही साहित्य पुरवत नाहीत. कामगार हे गटारीत उतरून हाताने गटारीतील घाण काढत आहेत. त्यांना बूट, हातमोजे, मास्क असे कोणत्याही प्रकारचे साहित्य मिळत नाही. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या लोकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मिळेल ते काम करतात. याचाच गैरफायदा घेऊन काही ठेकेदार या कामगारांच्या जीविताशी खेळत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात शासन हात स्वच्छ धुवा, मास्क लावा असे कळकळीने सांगत आहे. राहुरी नगरपरिषदेचे काम घेणारे ठेकेदार या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामगारांचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या साथीच्या आजाराने जगात थैमान घातले आहे. अशावेळी काम करत असताना जर एखाद्या कामगाराच्या जीवावर बेतले तर याला राहुरी नगरपरिषद प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार यापैकी कोण जबाबदार राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने ठेकेदारांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र टक्केवारीच्या ठेकेदारीमध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप असाच प्रकार राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

020621\img-20210601-wa0276.jpg

मंत्र्यांच्या गावात सफाई कर्मचारी असुरक्षित, कोण घेणार कर्मचाऱ्यांची दखल