शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या संचारबंदीची आता कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत ...

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचा आदेश पूर्वीचाच असून, या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिला आहे. हा आदेश २३ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत अमलात राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दुपारी आरोग्य यंत्रणेची नियोजन भवनात बैठक घेतली. कोरोना लॉकडाऊनबाबत दर महिन्याला आदेश जारी केला जातो. यापूर्वी २९ जानेवारीला नियमांचे पालन करण्याबाबतचा आदेश दिला होता. त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत फिरण्यास मनाई करण्यात आली होती. सकाळी ९ ते रात्री ९ ही दुकाने सुरू ठेवण्याची वेळ होती. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही व लग्न समारंभास ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या नियमांची जिल्ह्यात कुठेही अंमलबजावणी होत नव्हती. या २९ जानेवारीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देणारा नवा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी दिला. त्यानुसार या आदेशाची सोमवारी रात्रीपासूनच अंमलबजावणी सुरू झाली आहे.

----------

या नियमांचे पालन आवश्यक

२९ जानेवारीचा आदेश २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील

२३ फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत आदेशाची कडक अंमलबजावणी

रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी

पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

विवाह समारंभात ५०पेक्षा जास्त लोकांना मनाई

अंत्यसंस्कारास २० व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई

सार्वजनिक कार्यक्रमांनाही ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

हॉटेल, रेस्टाॅरंटमध्ये क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना परवानगी

सभा, संमलने, जत्रा, संस्थांच्या सभांसाठी ५० व्यक्तिंनाच परवानगी

मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर अनिवार्य राहील

-----------------

मंगल कार्यालयांना १० हजार रुपयांचा दंड

विवाह समारंभात ५० व्यक्तींपेक्षा जास्त लोक आढळले, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्यास १० हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मंगल कार्यालयावरील कारवाईचे अधिकार संबंधित भागातील पोलीस निरीक्षकांना देण्यात आला आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विशेष आदेश जारी केला आहे. मंगल कार्यालयात सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग, पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी व्यवस्था असणे आवश्यक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाच्या मालकांविरूध्द कारवाई होईल.