शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात २९.४ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ या खरीप हंगामाची आतापर्यंत २९.४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : तालुक्यात यंदाच्या २०२१-२२ या खरीप हंगामाची आतापर्यंत २९.४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. मात्र, मागील आठवड्यापासून तालुक्यात पावसाने दडी मारली असून उष्णतेतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पेरणी केलेली पिके संकटात सापडली आहे. तसेच ७ जुलैअखेर तालुक्यात १४०.६ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे.

यंदाच्या खरिपात आतापर्यंत (सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये) बाजरी ११३, कपाशी ६११, सोयाबीन ४,१३१, मका २,५४६ या पिकांसह उडीद ४०, तूर २, मूग ९८, भुईमूग १५, चारापिके ७२३, भाजीपाला २३०.९०, मसाला पिके २०.२० पिकांची पेरणी करण्यात आली.

तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी होते. त्यातच काही गावांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केलेली पिके अत्यंत चांगल्या पद्धतीने उतरून पडली होती. मात्र, आठवडाभरापासून पावसाने दडी मारली असून उन्हाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेमुळे पिके कोमेजून जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी व तुषार सिंचन उपलब्ध आहे, त्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध नाही, अशा शेतक-यांना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करून पिकांवर विविध प्रकारच्या रासायनिक औषधांसह खतांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकटातही आर्थिक जुळवाजुळव करून खरीप हंगामात पिके उभी केली आहे. मात्र, पावसाने दडी मारली आहे. या आठवड्यात पाऊस झालाच नाही, तर शेतकऱ्यांची सर्व पिके कामातून जातील. त्यामुळे शेतकरी पूर्णतः चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीमध्ये कमी प्रमाणात पेरणी झाली आहे.

...............

गेल्या वर्षीच्या तुलनेत सद्यःस्थितीत पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच १०० मिलिमीटर पेरणीयोग्य ओल पाऊस झाल्याशिवाय पेरणी करायची नाही, अशा सूचना आहे. मूग आणि उडीत ही पिके वगळता खरिपातील इतर सर्व पिकांची १५ जुलैपर्यंत पेरणी करता येते. तसेच सध्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांकडे पाणी तसेच तुषार सिंचन उपलब्ध असल्यास त्यांनी त्याद्वारे पिकांना पाणी द्यावे. ज्यांच्याकडे पाणी नाही, त्यांनी पोटॅशियम नायट्रेटची पिकावर फवारणी करावी.

- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

फोटो०७ - सोयाबीन, कोपरगाव