शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्याच्या चोरट्या वाहतुकीची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

माजी आमदार वैभव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी अकोले तालुक्यातील आदिवासी पेसा सरपंच परिषदेची बैठक झाली. या बैठकीत आदिवासी ...

माजी आमदार वैभव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी अकोले तालुक्यातील आदिवासी पेसा सरपंच परिषदेची बैठक झाली. या बैठकीत आदिवासी भागात येत असलेल्या अनेक अडीअडचणी दूर करण्याबाबत ठराव संमत करण्यात आले. याच बैठकीत मागील महिन्यात झालेल्या रेशन धान्य घोटाळ्याचा प्रश्नही काही सरपंचांनी उपस्थित केला आणि याच्या चौकशीचा ठरावही पारीत करण्यात आला.

यावेळी आदिवासी पेसा सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंदके, सरचिटणीस पांडुरंग खाडे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सरपंच गणपत देशमुख, सरपंच सयाजी असवले, सोमनाथ वाळेकर, भरत घाणे, सुनील सारुक्ते व आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्येने सरपंच उपस्थित होते.

पुरवठा विभागाकडून प्रत्येक गावात कोणत्या प्रकारचे आणि किती धान्य पाठविण्यात आले याचा मेसेज दक्षता समितीच्या सदस्यांना दिला जात होता. आपल्या गावात तांदूळ, गहू असा किती माल आला ते निदर्शनास येत होते मात्र ती व्यवस्था आता पुरवठा विभागाकडून बंद करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी यावेळी काही सरपंचांनी केली.

वितरण व्यवस्थेसाठी असणाऱ्या वाहनांना हिरवा रंग होता त्यामुळे ती वाहनांची ओळख व्हायची आता मात्र तसेच वाहने माल घेऊन येत असल्याने वाहने अधिकृत की अनधिकृत याची खात्री कशी होणार हा प्रश्न माजी सभापती भरत घाणे यांनी उपस्थित केला.

ज्या दिवशी या अनधिकृत वाहनांमधून हा माल नेला जात होता त्या मालाच्या चालनावर गोदामपालची सही तर नव्हतीच पण त्यांचे वितरण रजिस्टर पाहिल्यानंतर त्यावर या मालाची व त्या अगोदरच्या काही दिवसांच्या नोंदीही केलेल्या नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे गोरगरीब जनतेचा हा सर्व रेशनिंगचा माल कोणाच्या परवानगीने बाहेर पडला याबाबतचा आणि वाहनांच्या चौकशीची मागणी आपण केली होती. यातील खरे सूत्रधार कोण आहेत याची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे मत यावेळी माजी आमदार पिचड यांनी व्यक्त केले. रेशनिंग धान्याबाबतचा मुद्दा या बैठकीत घेण्यात आल्याने पुन्हा एकदा पुरवठा विभागाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

............

आमच्या गोरगरीब आदिवासी तसेच इतर जनतेच्या हक्काचे धान्य चोरणाऱ्यांना ही जनता माफ करणार नाही. या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणात दोषी असणारे राजकीय अथवा प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार व त्यांचे एजंट या सर्व दोषींवर तत्काळ कार्यवाही व्हावी. असा ठराव पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेत घेण्यात आला आहे. या संबंधीचे पत्रव्यवहार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना करणार असल्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंदके यांनी सांगितले.