शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एक एप्रिलपासून शिवभोजन थाळी दहा रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन काळात दहाऐवजी शिवभोजन थाळीचा दर पाच रुपयांना करण्यात आला होता. त्याची मुदत ३१ मार्चला संपणार ...

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊन काळात दहाऐवजी शिवभोजन थाळीचा दर पाच रुपयांना करण्यात आला होता. त्याची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शिवभोजन थाळीचा दर १ एप्रिलपासून दहा रुपयांना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही याच दिवसापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने २६ जानेवारी २०२० रोजी गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात भरपेट जेवण घेता यावे, यासाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ही थाळी १० रुपये एवढ्या सवलतीच्या दरात करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित, बेघर, गरीब, बाहेरगावचे विद्यार्थी यांचे जेवणासाठी हाल होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने १० ऐवजी शिवभोजन थाळीचा दर १० ऐवजी ५ रुपये करण्यात आला होता. सुरुवातीला ३० मार्च २०२० रोजी तीन महिन्यांसाठी ५ रुपये दर राहील, असा आदेश होता. मात्र लॉकडाऊन वाढत गेल्याने वेळोवेळी आदेश देऊन पाच रुपये या दरात थाळी देण्याबाबत मुदतवाढ दिली होती. शेवटच्या आदेशाची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचा दर १० रुपये करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. याबाबत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश काढून अवगत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

--------------------

जिल्ह्यात २९ शिवभोजन केंद्र

जिल्ह्यात सुरुवातीपासून कार्यरत असलेले २९ शिवभोजन केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवर आता दहा रुपयांना थाळी मिळणार आहे. त्यामुळे गरीब, गरजू लोकांनी शिवभोजन केंद्रांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

--------------

फाईल फोटो- शिवभोजन थाळी