शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठेला मुकलेले श्रमाचे साथीदार

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

संदीप रोडे अहमदनगर दुष्काळाच्या स्थितीत जिरायती शेती नापीक झाली. कुटुंब मोठं असल्याने खायची पंचायत झाली. अशातच मामा भेटले. त्यांनी हमाली कामासाठी नगरला आणले.

संदीप रोडे अहमदनगरदुष्काळाच्या स्थितीत जिरायती शेती नापीक झाली. कुटुंब मोठं असल्याने खायची पंचायत झाली. अशातच मामा भेटले. त्यांनी हमाली कामासाठी नगरला आणले. ४० वर्षापासून हमाली काम करणारे उत्तम जिजाबा हल्लाळ (जामगाव,ता. पारनेर) सांगत होते. शारीरिक कष्टाचे काम केल्याशिवाय पोटाला अन्न मिळत नाही. रोजंदारीवर काम केले तर पोटभर अन्न मिळेल याची शाश्वती नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. पण तरीही हमाली काम हीच प्रतिष्ठा मानून ओझे वाहण्याचे काम अविरतपणे सुरू असल्याचे हल्लाळ अभिमानाने सांगत होते. मात्र ओझे वाहणाऱ्या हमालाला समाजात मान सन्मान मिळत नसल्याची खंत हमाल बांधवांच्या बोलण्यातून जाणवली. श्रमप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर हमाली काम करणाऱ्या माथाडी कामगारांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मुकुंदनगर येथील युसूफ सय्यद पूर्वी दुकानात काम करायचे. दिवसभराची रोजंदारी ६० रुपये. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसे. त्यामुळे ते हमाली कामाकडे वळाले. आडतबाजार, दाळमंडई परिसरात २५५ हमाल पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबराब राबतात. व्यापाऱ्यांचा माल तालुक्याच्या गावातील दुकानात पोहचविण्याची जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतात. शनिवारी दिवसभरात फक्त २० रुपये मिळाले. असुरक्षित असले तरी हमाली कामच आमची प्रतिष्ठा आहे. युसूफचा मोठा मुलगा बारावी नापास झालाय. त्याला कापडदुकानात कामाला जुंपले. छोटा मुलगा धार्मिक शिक्षण घेतो. धार्मिक क्षेत्रात तो करिअर करणार आहे. पारनेर या दुष्काळी तालुक्यातील जामगावचे हल्लाळ यांच्या आयुष्यातील कमाईची सुरूवातच हमाली कामातून झाली. तीन भाऊ, तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबाच्या काफिल्यात उत्तमराव वाढत होते. वडील विहीर खोदाईचे काम करत. दुष्काळाच्या स्थितीत जिरायती जमीनही नापीक झाली. त्यामुळे पंचायत झाली. अशातच मामा हरिभाऊ मुंजाळ भेटले. त्यांनी नगरला आणले. तेही हमाली काम करायचे. त्यांनी हमाली कामाला जुंपले. मुलगा चांगला म्हणून मग जावई करून घेतले. हमाली कामातूनच पोटापाण्याची गुजराण सुरू झाली. शेती जिरायती असल्याने गावाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. मुलगा व्यापारी पेढीत दिवाणजीचे काम करतो. वर्षभरापूर्वी मोटारसायकलला झालेल्या अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. पायात डॉक्टरांनी सळई टाकली. पण अशातही हमाली काम हीच पूजा मानून काम करत असल्याचे सांगताना श्रम हीच प्रतिष्ठा मानतो. त्याशिवाय घरात स्वयंपाक होऊ शकत नाही अशी उद्विवग्नताही त्यांनी व्यक्त केली.