शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

निवडणूक पार्श्वभूमीवर नगरमध्ये ३६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; तिघे हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 13:02 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या कारवाईचे आदेश दिले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ज्यांच्यावर एक किंवा एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना निवडणुकीच्या काळात शहरातून, जिल्ह्यातून हद्दपार करावे किंवा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव  पोलिसांकडून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे दाखल झाले होते. त्यात शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक, तसेच राजकीय पदाधिका-यांचा समावेश आहे. सुनील अंबादास तांबे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) याला सहा महिन्यासाठी, तर आश्पाक उर्फ बाबा निसार शेख (रा. चांदा, ता. नेवासा) व गोरख करांडे (रा. देहरे, ता. नगर) या दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.कोतवाली १०६, नगर तालुका २४, तोफखाना ९२, एमआयडीसी ३८, तर भिंगार पोलीस ठाण्यातून १०१ अशा एकूण ३६१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी, संभाजी कदम, विक्रम राठोड, विनीत पाऊलबुधे, स्वप्निल रोहिदास शिंदे, निखिल बाबासाहेब वारे, कुमार वाकळे, सचिन तुकाराम जाधव, चत्तर निसार शेख,स्वप्निल अशोक ढवण, निलेश भाकरे, दिगंबर गेंट्याल,अंकुश मोहिते,  ओमकार भागानगरे, श्रीकांत छिंदम, संदीप जाधव, शेख मन्सूर शेख आसिफ शेख,  शहानवाज सय्यद, तनवीर पठाण, वैभव वाघ, श्रीकांत मुर्तडक, राकेश वाडेकर, गोपाल मालवानी, रोहित फड, आदित्य गवळी, प्रमोद नेटके, संतोष सेंदर, प्रशांत सेंदर, वसीम शेख, रशीद सलमान शेख, मोहसीन खान सलमान, आरिफ खान, दीपक सचिन महाजन, अजिंक्य म्हस्के, शेख वसीम, रफिक शेख, रिजवान रशीद आदींसह ३६१ जणांचा त्यात समावेश आहे. १९ ते २४ आॅक्टोबरदरम्यान शहरात कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी, रोज सायंकाळी सहा वाजता आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशा काही अटी-शर्तींवर या सर्वांना शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग