शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

निवडणूक पार्श्वभूमीवर नगरमध्ये ३६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; तिघे हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 13:02 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार, तर ३६१ जणांना अटी-शर्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या कारवाईचे आदेश दिले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ज्यांच्यावर एक किंवा एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना निवडणुकीच्या काळात शहरातून, जिल्ह्यातून हद्दपार करावे किंवा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव  पोलिसांकडून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे दाखल झाले होते. त्यात शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक, तसेच राजकीय पदाधिका-यांचा समावेश आहे. सुनील अंबादास तांबे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) याला सहा महिन्यासाठी, तर आश्पाक उर्फ बाबा निसार शेख (रा. चांदा, ता. नेवासा) व गोरख करांडे (रा. देहरे, ता. नगर) या दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.कोतवाली १०६, नगर तालुका २४, तोफखाना ९२, एमआयडीसी ३८, तर भिंगार पोलीस ठाण्यातून १०१ अशा एकूण ३६१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी, संभाजी कदम, विक्रम राठोड, विनीत पाऊलबुधे, स्वप्निल रोहिदास शिंदे, निखिल बाबासाहेब वारे, कुमार वाकळे, सचिन तुकाराम जाधव, चत्तर निसार शेख,स्वप्निल अशोक ढवण, निलेश भाकरे, दिगंबर गेंट्याल,अंकुश मोहिते,  ओमकार भागानगरे, श्रीकांत छिंदम, संदीप जाधव, शेख मन्सूर शेख आसिफ शेख,  शहानवाज सय्यद, तनवीर पठाण, वैभव वाघ, श्रीकांत मुर्तडक, राकेश वाडेकर, गोपाल मालवानी, रोहित फड, आदित्य गवळी, प्रमोद नेटके, संतोष सेंदर, प्रशांत सेंदर, वसीम शेख, रशीद सलमान शेख, मोहसीन खान सलमान, आरिफ खान, दीपक सचिन महाजन, अजिंक्य म्हस्के, शेख वसीम, रफिक शेख, रिजवान रशीद आदींसह ३६१ जणांचा त्यात समावेश आहे. १९ ते २४ आॅक्टोबरदरम्यान शहरात कायदा-सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी, रोज सायंकाळी सहा वाजता आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशा काही अटी-शर्तींवर या सर्वांना शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग