शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या फडात कोरोनाला नो एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

मच्छिंद्र देशमुख कोतूळ : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मात्र, अकोले तालुक्यात अगस्ती कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आलेले आठ हजार ...

मच्छिंद्र देशमुख

कोतूळ : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मात्र, अकोले तालुक्यात अगस्ती कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आलेले आठ हजार कामगार व त्यांच्या कुटुंबात सहा महिन्यांत एकही कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला नाही.

कोतूळ येथे ५० कुटुंबांत मिळून १५० लोक ऊस तोडणीसाठी सहा महिन्यांपासून राहतात. कोतूळात कोरोनाने एका महिन्यात बारा लोकांचा बळी घेतला. मात्र, याच गावात सहा महिने राहणाऱ्या ऊस तोडणी कामगारांपैकी एकही बाधित नाही.

अगस्तीच्या कोतूळ, अकोले, इंदोरी, कळस, देवठाण, टाकळी, उंचखडक, सुगाव या सर्व ठिकाणी सहा हजार कामगार व कुटुंबातील लहान मुले वृद्ध असे आठ हजार लोक ऊस तोडणी व वाहतूक काम करतात. सहा महिन्यांत ऊस तोडणी कामगारांत एकही बाधित निघाला नाही, असे कोतूळ येथील ऊस तोडणी कामगार रावसाहेब चरणदास पवार, राहुल कैलास चव्हाण, ईश्वर सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

अगस्तीसह सर्वच कारखाने कोरोनामुळे कामगार टिकतील का, या विवंचनेत होते. अगस्तीने ऊस वाहतूक व तोडणी कामगारांना सहा हजार मास्क, सॅनिटायझर दिले. तसेच लोकसंपर्क येऊ नये म्हणून राहण्याच्या अड्ड्यावर स्थानिक किराणा दुकानदारांना, तर कारखाना स्थळावर कामगारांना दुकाने काढण्याची परवानगी दिली. तर इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून प्रत्येक अड्ड्यावर एक कर्मचारी ऑक्सिमीटरसह ठेवला. अगस्तीने नेमलेल्या डाॅक्टरमार्फत वेळोवेळी तपासणी व औषधोपचाराची सोय केली.

तसेच कारखाना व तोडणी अड्ड्यावर इतर लोकांना प्रवेशबंदी केल्याने येथे कोरोना आलाच नाही.

..........

तोडणी कामगार व वाहतूक यंत्रणेतील लोकांशी इतरांचा संपर्क येऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक, सॅनिटायझर, मास्क, आरोग्य तपासणी, औषधोपचार, कोरोनाबाबत जागृती केली जात होती. रोज कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड व संचालक मंडळ याबाबत सूचना करत होते. त्यामुळे अगस्तीत एकाही ऊस तोडणी कामगाराला कोरोनाची बाधा झाली नाही.

- भास्कर घुले, कार्यकारी संचालक, अगस्ती.

............

सुरुवातीला कोरोनामुळे कामगार येतात की नाही या धाकधुकीत आम्ही होतो. अध्यक्षांसह सर्व संचालक व प्रशासनाने दर आठवड्याला कामगार आरोग्याचा आढावा घेतला. आम्ही तोडणी कामगारांना स्वतंत्र कोविड केअरची व्यवस्था केली होती. मात्र, काळजी घेतल्याने एकही रुग्ण निघाला नाही.

-सिताराम गायकर, उपाध्यक्ष अगस्ती.

........

आम्ही दिवसभर काबाडकष्ट करतो. विहीर, नदी, नळ अशा विविध ठिकाणचे पाणी, ऊन अशा वातावरणात काम करतो. कोणताही आजार रेटण्याची शरीराला सवय झाली. यंदा अगस्तीने आमची खूप काळजी घेतली. त्यामुळे कोरोना ऊसाच्या फडात आलाच नाही.

-रावसाहेब चरणदास पवार, ऊस तोडणी कामगार, अगस्ती