शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीमुळे येथील महापौर पदाचा गुंता वाढला आहे. निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, अशी ...

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीमुळे येथील महापौर पदाचा गुंता वाढला आहे. निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. परंतु, निवडणुकीचे सूत्र अजून तरी ठरलेले नाही. त्यामुळे बहुमताचा जादुई आकडा कोण गाठणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महापालिकेत सध्या भाजप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाल ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी महापौर पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या नगरसचिव कार्यालयाने विभागीय आयुक्तांना पाठविलेला आहे. परंतु, विभागीय आयुक्तांकडून अद्याप कार्यक्रम जाहीर केला गेला नाही. गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर झाला. सर्वाधिक संख्याबळ असूनही सेनेला सत्तेतून बाहेर राहावे लागले. यावेळी मात्र सेनेने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला आहे, पण महाविकास आघाडी आडवी आली. त्यामुळे मातोश्रीवरून निरोपाचा फोन अजून खणखणला नाही. राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. परंतु, नगरमध्ये सेना व राष्ट्रवादी एकत्र येईलच, याची खात्री देता येणार नाही. आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. परंतु, आमदार जगताप हे सध्या वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे ते एनवेळी काय भूमिका घेतील, हे आताच सांगणे कठीण आहे.

महापौर पदासाठी ३४ नगरसेवकांचा पाठिंबा लागणार आहे. सेनेकडे २३ नगरसेवक आहेत. सेनेला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आणखी ११ नगरसेवकांची गरज पडणार आहे. राष्ट्रवादीकडे १९ नगरसेवक आहेत. सेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास बहुमतासाठी अन्य पक्षांची गरज पडणार नाही. परंतु, सेना व राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर सहजासहजी एकत्र येतील, असे वाटत नाही. त्यामुळे ऐनवेळी फाटाफूट होऊ शकते, हे गृहीत धरूनच सेनेची वाटचाल सुरू आहे. अशीच आवस्था राष्ट्रवादीचीही आहे. वरिष्ठांनी आदेश दिल्यास राष्ट्रवादीही निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते. तशी राष्ट्रवादीने तयारी ठेवली आहे; परंतु तसा आदेश येण्याची शक्यता कमी आहे, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक खासगीत बोलताना सांगतात. काँग्रेसने महापौर पदावर दावा ठोकला आहे; परंतु काँग्रेसचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे खरी चुरस सेना व राष्ट्रवादीतच आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसला झुकते माप आहे. परंतु, हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी बहुमताचा जादुई आकडा त्यांना गाठता येणार नाही. सेना व राष्ट्रवादीची फाटाफूट होईल, असे गृहीत धरून भाजपाच्या पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी भाजप नगरसेवकांच्या महिनाभरापासून बैठका सुरू आहेत. परंतु, सत्तेच्या बाजूने राहायचे की विरोधात बसायचे, या निर्णयापर्यंत भाजपचे नगरसेवक अजून तरी पोहोचलेले नाहीत. त्यांच्यात मतभेद आहेत. काहीजण निराेपाची वाट पाहून आहेत. बसपाचे ५ नगरसेवक आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते, असे बसपाच्या नगरसेवकांना वाटते.

....

भाजप- बसपात गुफ्तगू

सेना व राष्ट्रवादीला एकत्र आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगर शहरातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सेना व राष्ट्रवादीत टोकाचा संघर्ष आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आहेत. म्हणूनच त्यांना महत्त्व आहे. एकत्र आल्यास दोघांनाही धोका आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाहीत, असेच चित्र भाजप व बसपाकडून रंगविले जात आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आले नाही तर भाजप व बसपाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याही बैठका सुरू आहेत.