शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

आठच्या आत घरात; अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:15 IST

संगमनेर : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. रविवारपासून (दि.२८) रात्री ८ ते ...

संगमनेर : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असताना प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. रविवारपासून (दि.२८) रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीसाठी निर्बंध घालण्यात आले असून, हा आदेश १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. संगमनेर शहर व परिसरात प्रशासनाकडून दवंडी देऊन नव्या निर्बंधांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावा, मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, तसे झाल्यास एक हजार रुपये दंड केला जाईल, असे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.

रात्री आठनंतर संगमनेर शहर परिसरातील कोणतीही दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अथवा सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार नाहीत. यातून केवळ औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.