‘त्या’ युवकाच्या कुटुंबियांना ‘प्रहार’कडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:29+5:302021-04-16T04:20:29+5:30
अहमदनगर : मूळचा पाथर्डी तालुक्यातील असलेल्या युवकाची औरंगाबाद येथे हत्या करण्यात आली. प्रहार जनशक्ती संघटनेने या तरुणाच्या कुटुंबियांची भेट ...

‘त्या’ युवकाच्या कुटुंबियांना ‘प्रहार’कडून मदतीचा हात
अहमदनगर : मूळचा पाथर्डी तालुक्यातील असलेल्या युवकाची औरंगाबाद येथे हत्या करण्यात आली. प्रहार जनशक्ती संघटनेने या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.
पाथर्डी तालुक्यातील हरीचा तांडा येथील विकास चव्हाण याची ९ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे निर्घृण हत्या करण्यात आली. विकास हा बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेला होता. तेथे हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. विकासच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरासाठी विकासच कर्ता होता. तो गेल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार, अजय महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रवक्ते संतोष पवार व जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी नुकतीच या कुटुंबाची सांत्वनपर भेट देऊन दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याशिवाय शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाईसाठी औरंगाबाद येथे पाठपुरावा सुरू केला आहे, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, जिल्हा सचिव प्रकाश बेरड उपस्थित होते.
--------------
फोटो मेल वर
१५ प्रहार मदत
औरंगाबाद येथे हत्या झालेल्या पाथर्डी तालुक्यातील तरुणाच्या कुटुंबियांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत केली. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, लक्ष्मण पोकळे, प्रकाश बेरड, आदी उपस्थित होते.