शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांनी थकविली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकविली असून, शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात ...

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकविली असून, शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सतीश कानवडे, राजेंद्र बनसोडे, महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, अमित गटणे, अंबादास ढाकणे, संदीप उगले, सुनील देवकर, जनार्दन रोहोम यांचा समावेश होता. या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले थकविली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भार्गव कमिटीच्या शिफारशीनुसार उपपदार्थ निर्मितीतून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. कारखान्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, एफआरपीनुसार शेतकऱ्यांना बिले अदा करण्याबाबत कारखान्यांना आदेश द्यावेत. तसेच राज्य सरकार व दूध माफिया हातात हात घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत आहेत. दुधाला तीस रुपये भाव मिळावा, भेसळयुक्त दूध माफियांवर कारवाई करावी, यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

...

सूचना: फोटो ०५ भाजप नावाने आहे.