शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या कर्जफेडीसाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:23 IST

अहमदनगर : राज्यात अहमदनगर जिल्हा बँकेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळेच साखर कारखाने, दूध संघ अशा एक ना अनेक संस्था ...

अहमदनगर : राज्यात अहमदनगर जिल्हा बँकेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळेच साखर कारखाने, दूध संघ अशा एक ना अनेक संस्था बँकेच्या योगदानातून उभ्या राहिल्या. मागील वर्ष साखर कारखानदारीसाठी अडचणीचे होते. यंदा मात्र साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे कारखान्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी प्राधान्य द्यावे. बँक प्रशासन, संचालक मंडळानेही त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संचालकांना दिल्या.

जिल्हा बँकेची ६४ वी सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाईन झाली. यावेळी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, करण ससाणे, अंबादास पिसाळ, राहुल जगताप, गणपत सांगळे, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर, रामदास वाघ, अनुराधा नागवडे, सचिन गुजर, काकासाहेब तापकीर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी सभागृहात उपस्थित होते, तर इतर सदस्यांनी सभेस ॲानलाईन हजेरी लावली.

मंत्री थोरात म्हणाले की, बँकेचा कारभार आतापर्यंतच्या संचालक मंडळांनी व्यवस्थित पाहिला. आता या संचालक मंडळानेही त्या लौकिकात भर टाकून उत्कृष्ट काम करून दाखवावे. बँकेने अनेक संस्थांना कर्जरूपी मदत केलेली आहे. विशेषत: साखर कारखानदारी उभारणीत बँकेचा वाटा मोठा आहे. यंदा साखरेचे भाव चांगलेे असल्याने कारखान्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत फेडावे. संचालक मंडळ व प्रशासनानेही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून बँकेच्या योगदानास हातभार लावावा. नगर जिल्हा व केेरळात कोरोना रुग्णांची वाढ दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप संपलेला नाही. परिणामी काम करताना बँक कर्मचारी व संचालक मंडळाने काळजी घ्यावी, असे थोरात म्हणाले.

----------

कर्ज वाढले, गुंतवणुकीत घट

यंदा बँकेच्या कर्जवाटपात वाढ झाल्याने तसेच ठेवीवरील व्याजदरात घट झाल्याने गुंतवणुकीत घट झाली असली, तरी खेळते भांडवल व नफ्यात वाढ झाल्याचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी सांगितले. २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये नफा वाढून ४२ कोटी ५४ लाख झाला आहे. खेळते भांडवल १० हजार ७७० कोटी आहे. ठेवी ८ हजार ३६४ कोटी आहेत. यासह नाबार्ड अल्प व्याजात घेण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम १ हजार ४०० कोटीपर्यंत पोहोचली आहे. तसेच कर्ज वाटप वाढल्याने गुंतवणूक मात्र एक हजार कोटींनी कमी झाली आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, एकूण एनपीए हा ५.५४ टक्के असल्याची माहिती शेळके यांनी दिली.

---------------

फोटो - २५एडीसीसी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी झाली.