शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात ३६ डॉक्टरांनी सोडले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ...

अहमदनगर : कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या डॉक्टरांपैकी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम करण्यास नकार देत राजीनामे दिले.

जिल्हा परिषदेला डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांतील अनेक पदे रिक्त राहतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदेत एमबीबीएस डॉक्टरांच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडून वर्षभरात २२ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यापैकी १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले. या डॉक्टरांची ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांनी राजीनामे दिल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७ डॉक्टरांच्याही नियुक्त्या जिल्हा परिषदेत केल्या गेल्या. यापैकी १३ डॉक्टर सध्या कार्यरत असून, उर्वरित ४ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती केली. आरोग्य विभागाने कोरोनाकाळात ७२ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती असून, यापैकी ५५ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. उर्वरित १७ बीएएमएस डॉक्टरांनी अभ्यासाचे कारण देत राजीनामे दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१३ पदे आहेत. या पदांवर कायमस्वरूपी नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी असते; परंतु त्यापूर्वीच अनेक जण सोडून जातात. त्यामुळे पदे रिक्त होतात. रिक्त झालेल्या पदांवर तातडीने जाहीरातीव्दारे बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे पदे रिक्त झालेली नाहीत. आरोग्य सेवा खंडित होणार नाही, यासाठी ही काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

....

कोरोनाकाळातील नियुक्त्या

जिल्हा प्रशासनाकडून - २२

नाशिक विभागीय कार्यालयाकडून १७

बीएएमएस- ७२

...

हजर झालेले -७५

राजीनामे दिलेले -३६

......

अभ्यासाचे कारण देत राजीनामा

जिल्हा परिषदेत कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु, पुढील शिक्षण सुरू असून, अभ्यास करण्यासाठी राजीनामा देत आहे, असे कारण बहुुतांश डॉक्टरांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.

....

जिल्हा परिषदेत एकही पद रक्त नाही

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्याने बीएएमस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यामुळे या काळात जिल्हा परिषदेचे एकही पद रिक्त नाही. कोरोना नसताना पदे रिक्त होती; परंतु कोरोनाकाळात आरोग्य सेवा खंडित होऊ नये, यासाठी तातडीने डॉक्टरांची भरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

....