शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
4
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
5
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
6
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
7
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
8
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
9
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
10
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
11
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
12
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
13
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
14
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
15
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
16
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
17
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
18
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
19
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
20
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांची जिल्हा बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST

अहमदनगर : शेतकरी कायद्याविरोधात करण्यात येणाऱ्या भारत बंदमध्ये अहमदनगर जिल्हा सहभागी होणार असून, जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांच्या नेत्यांनी ...

अहमदनगर : शेतकरी कायद्याविरोधात करण्यात येणाऱ्या भारत बंदमध्ये अहमदनगर जिल्हा सहभागी होणार असून, जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांच्या नेत्यांनी सोमवारी जिल्हा बंदची हाक दिली आहे.

शेतकरी कायद्याविरोधात जिल्ह्यातील कामगार नेत्यांनी येथील हमाल पंचायत येथे आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, ॲड. सुभाष लांडे, ॲड. बन्सी सातपुते, ॲड. सुधीर टाेकेकर, आर्किटेक्ट अर्शद शेख, रावसाहेब निमसे, विलास पेत्रम, फिरोज शेख, बाळासाहेब वैद्य आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याची टीका अविनाश घुले यांनी केली. ते म्हणाले, केंद्र सरकारने विश्वासात न घेता कृषी व कामगार कायदे केले आहेत. या बंदला भाजप प्रणित संघटना वगळता इतर सर्व कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत, चार श्रम संहिता मागे घ्याव्यात, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करून महागाईला आळा घालावा, या संघटनेच्या मागण्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला २६ सप्टेंबर रोजी दहा महिने पूर्ण होेत आहेत. सरकारने आंदोलनकर्ते शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा केलेली नाही. शेतीमालाला किमान हमीभाव देण्याची तरतूद सरकारने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारकडून बड्या भांडवलदारांना शेतकरी व जनतेच्या लुटीचा दिलेला हा खुला परवाना आहे. या कायद्यामुळे शेतकरी गुलामगिरीत ढकलला जाणार आहे. त्याला शेती क्षेत्रातून बेदखल करण्याचे सरकारचे हे षडयंत्र आहे. तसेच नवीन कायद्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल. बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. कामगार संघटनांनी वेळाेवेळी आंदोलने करून हक्क व अधिकार मिळविलेले आहेत. ते नवीन कायद्यामुळे संपुष्टात येणार असल्याने कामगार संघटना आंदोलनात सहभागी होत असल्याचे कामगार नेत्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

....

सामान्यांची दिल की बात सरकार का ऐकत नाही

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांशी मन की बात करतात; मात्र सामान्यांची दिल की बात मात्र ऐकत नाही. जनतेला नको असलेले कायदे रद्द करणे अपेक्षित आहे, परंतु सरकार जनतेवर कायदे लादत असून, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याची टीका आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी केली.

.....