शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

आहारावर नियंत्रण महत्त्वाचे-डॉ.गोपाळ बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:11 IST

योग्य आहार, व्यायाम आणि योग-प्राणायाम नियमित असेल, तर मधुमेहाला पळवून लावू शकतो. शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करणारा हा आजार आहे. शरीरातील वाढणारी साखर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत मधुमेहाच्या रुपाने दुष्परिणाम करते. रोज नित्य एक तास चालण्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी व्यक्त केला.

जागतिक मधुमेह नियंत्रण दिन विशेष  अहमदनगर : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. घरामध्ये कोणाला मधुमेह नाही, म्हणजे तो आपल्याला होणार नाही, असे मुळीच नाही. योग्य आहार, व्यायाम आणि योग-प्राणायाम नियमित असेल, तर मधुमेहाला पळवून लावू शकतो. शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करणारा हा आजार आहे. शरीरातील वाढणारी साखर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत मधुमेहाच्या रुपाने दुष्परिणाम करते. रोज नित्य एक तास चालण्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी व्यक्त केला. जागतिक मधुमेह नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मधुमेहाचा आजार आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला.मधुमेहाचा आजार कधी होतो? व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, वार्धक्य, स्वादुुपिंडाचे आजार, थॉयराईडचे आजार आदी कारणांनी हा आजार होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, की स्वादुपिंडाचे संप्रेरक इन्शुलिन याचे कमी प्रमाणात स्त्रवन झाल्यामुळे शरीरातील, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. उपाशीपोटी ८० ते १०० आणि जेवणानंतर १२०-१८० असे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य असते. मधुमेह तीन टप्प्यांमध्ये होतो.मधुमेहाची लक्षणे कोणती?कामात उत्साह न वाटणे, कमी श्रम केल्यानंतरही वारंवार थकवा जाणवणे, लघवीला वारंवार व अतिप्रमाणात होणे, लघवीला विशिष्ट प्रकारचा मधुगंध येणे, तोंडाला वारंवार दोड पाणी, लाळ आल्यासारखे वाटणे, तहान वारंवार लागणे ही व यासारखी मधुमेहाची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात.मधुमेहाचे नियंत्रण कसे करायचे?मधुमेह हा पूर्णपणे बरा न होणारा, परंतु औषधोपचार व व्यायामाने नियंत्रित होणारा आजार किंवा व्याधी आहे. औषधौपचाराद्वारे, व्यायामाद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करता येते. मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी फक्त चार गोष्टींची आवश्यकता आहे. १) आहार नियंत्रण, २) नियमित औषधोपचार, ३) व्यायाम, ४) डॉक्टरांचा सल्ला व तपासणी. एकाचवेळी भरपूर आहार घेण्यापेक्षा थोड्याथोड्या प्रमाणात आहार घ्यावा. चालणे, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, रोज एक तास नियमित चालावे. जेवणानंतर वज्रासनात बसावे. नियमित व्यायामामुळे केवळ मधुमेहावरच नव्हे, तर सर्वच आजारांवर योग्य परिणाम होतो. याशिवाय डॉक्टरांकडून वारंवार तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरdiabetesमधुमेह