शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संशोधकांना या वर्षीपासून पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

राहुरी (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांचे कष्ट कमी करता येतील, उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी चांगले संशोधन होणे ...

राहुरी (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांचे कष्ट कमी करता येतील, उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी चांगले संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणजेच अन्नदेवतेसाठी असे संशोधन करणे हे पुण्याचे काम आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी यावर्षीपासून उत्तम प्रतिचे कृषी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरू पी.जी. पाटील, शरद गडाख, विकास पाटील उपस्थित होते.

भुसे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी कार्य फार मोठे आहे. पण यापुढे नावीण्यपूर्ण संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. कमी खर्चाचे आणि शेतकऱ्यांना शेतीवर वापरता येईल, अशी सूक्ष्म सिंचन पध्दती विकसित होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या बियाण्यावर विश्वास असून त्याची मागणी वाढली आहे. विद्यापीठांनी जास्तीत जास्त बियाण्यांचे उत्पादन वाढवावे. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाला चालना द्यावी. कमी दरात उच्च प्रतिचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पिकाच्या उत्पादकतेबरोबर पोषकता वाढण्यासाठी संशोधनात भर द्यावा. नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय ठेवावा. परदेशी भाजीपाला व फळ यावर कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे. बाजारपेठेच्या मागणीनुसार वाण विकसित करणे, परदेशी पिकांचा संशोधनात आंतरभाव करणे व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

..............

रिक्त जागा भरण्यास परवानगी द्या

कुलगुरू पी.जी. पाटील म्हणाले, कृषिमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार कृषी विद्यापीठामध्ये विविध संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. विद्यापीठाच्या संशोधनाला गती देण्यासाठी बंद झालेला विद्यापीठ आकस्मिक निधी पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. विद्यापीठ मॉडेल ॲक्ट अंमलात आणला तर कृषी विद्यापीठांना सहाय्य होईल. विद्यापीठातील ५० टक्के जागा रिक्त जागा भरण्यास शासन स्तरावर परवानगी मिळावी.

.............

विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिले ६५ लाख

कोविड आपत्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्यावतीने ६५लाख रुपयांचा धनादेश चार हजारचा धनादेश कुलगुरू पी. जी. पाटील यांचे हस्ते यांचे हस्ते कृषिमंत्र्यांना सुपुर्द करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे संचालक फलोत्पादन कैलास मोते, विशेष कार्य अधिकारी रफिक नायकवाडी, सुधाकर बोराळे उपस्थित होते.

280621\1612-img-20210628-wa0078.jpg

कष्टकरी शेतकर्यांसाठी संशोधन करणे हे पुण्याचे काम

- कृषि मंत्री. दादाजी भुसे