शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

नगरमध्ये युती की घोडेबाजार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:48 IST

महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे.

- सुधीर लंके अहमदनगर : महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे. युतीतील भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस उठविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. काँग्रेस व छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्त्व आले आहे.महापालिकेत ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. शिवसेना (२४) व भाजपा (१४) एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३८ वर पोहोचून त्यांची सहजासहजी सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, सेना-भाजपामध्ये येथे विस्तवही जात नाही. सेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड व भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राठोड यांना शहरात ‘भैय्या’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी नगरच्या दहशतीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला असून प्रत्येक निवडणुकीत ते ‘भयमुक्त नगर’ ही घोषणा देतात. गांधी यांनी त्यांच्यावर टीका करताना ‘नगर शहर भयमुक्त करण्यापेक्षा भैयामुक्त करावयाचे आहे’ असे विधान निवडणुकीत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘भयमुक्तीची घोषणा करणाऱ्यांचेच या शहराला भय असून त्यांनाही आम्ही आत घालू शकतो’ असा इशारा प्रचार सभेत दिला होता. त्यामुळे राठोड हे भाजपाला सहजासहजी सोबत घेतील अशी परिस्थिती नाही. निकालानंतर प्रतिक्रिया देताना देखील राठोड, गांधी यांनी एकमेकावर टीका केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यासच स्थानिक नेते एकत्र येऊ शकतात.राष्ट्रवादी (१८) व काँग्रेस (५) मिळून ही आघाडी २३ जागांवर पोहोचते. त्यांना बहुमतासाठी १२ जागा कमी पडतात. बसपाचे चार, अपक्ष दोन व समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराने त्यांना साथ दिली तरी त्यांचे संख्याबळ ३० च्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करावयाची असल्यास सेना, भाजपापैकी कुणाचीतरी साथ घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात शहरात तात्विक मतभेद असून शिवसेनेने राष्टÑवादीला आजवर उघड साथ केलेली नाही. सेनेने सातत्याने राष्ट्रवादीवर आरोप केलेले असल्याने या दोघांनी एकमेकांसोबत जाणे हे विरोधाभास दर्शविणारे ठरेल. हे दोन्ही पक्ष एकमेकाची छुपी साथ करतात मात्र, उघडपणे एकमेकांची साथ करतील का?, ही शंका आहे.पक्षीय बलाबलपक्ष                  २०१३      २०१८शिवसेना            १७          २४भाजपा               ०९          १४राष्ट्रवादी             १८          १८काँग्रेस               ११           ०५मनसे                ०४           ००बसपा               ००           ०४समाजवादी       ००           ०१अपक्ष               ०९           ०२शिवसेना-काँग्रेस एकत्र येणार?नगर शहरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे सध्या काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत.राष्ट्रवादीला दूर ठेवत काँग्रेसने सेनेसोबत हातमिळवणी केली व इतर छोट्या पक्षांना त्यांनी सोबत घेतले तर त्यातूनही बहुमत साकारु शकते.विखे हे फोडाफोडीचे राजकारण करु शकतात. त्यामुळे काँग्रेस व छोट्या पक्षांच्या हातीही सत्तेच्या चाव्या आहेत.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस