शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

नगरमध्ये युती की घोडेबाजार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:48 IST

महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे.

- सुधीर लंके अहमदनगर : महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे. युतीतील भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस उठविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. काँग्रेस व छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्त्व आले आहे.महापालिकेत ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. शिवसेना (२४) व भाजपा (१४) एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३८ वर पोहोचून त्यांची सहजासहजी सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, सेना-भाजपामध्ये येथे विस्तवही जात नाही. सेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड व भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. राठोड यांना शहरात ‘भैय्या’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी नगरच्या दहशतीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला असून प्रत्येक निवडणुकीत ते ‘भयमुक्त नगर’ ही घोषणा देतात. गांधी यांनी त्यांच्यावर टीका करताना ‘नगर शहर भयमुक्त करण्यापेक्षा भैयामुक्त करावयाचे आहे’ असे विधान निवडणुकीत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘भयमुक्तीची घोषणा करणाऱ्यांचेच या शहराला भय असून त्यांनाही आम्ही आत घालू शकतो’ असा इशारा प्रचार सभेत दिला होता. त्यामुळे राठोड हे भाजपाला सहजासहजी सोबत घेतील अशी परिस्थिती नाही. निकालानंतर प्रतिक्रिया देताना देखील राठोड, गांधी यांनी एकमेकावर टीका केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यासच स्थानिक नेते एकत्र येऊ शकतात.राष्ट्रवादी (१८) व काँग्रेस (५) मिळून ही आघाडी २३ जागांवर पोहोचते. त्यांना बहुमतासाठी १२ जागा कमी पडतात. बसपाचे चार, अपक्ष दोन व समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराने त्यांना साथ दिली तरी त्यांचे संख्याबळ ३० च्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करावयाची असल्यास सेना, भाजपापैकी कुणाचीतरी साथ घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात शहरात तात्विक मतभेद असून शिवसेनेने राष्टÑवादीला आजवर उघड साथ केलेली नाही. सेनेने सातत्याने राष्ट्रवादीवर आरोप केलेले असल्याने या दोघांनी एकमेकांसोबत जाणे हे विरोधाभास दर्शविणारे ठरेल. हे दोन्ही पक्ष एकमेकाची छुपी साथ करतात मात्र, उघडपणे एकमेकांची साथ करतील का?, ही शंका आहे.पक्षीय बलाबलपक्ष                  २०१३      २०१८शिवसेना            १७          २४भाजपा               ०९          १४राष्ट्रवादी             १८          १८काँग्रेस               ११           ०५मनसे                ०४           ००बसपा               ००           ०४समाजवादी       ००           ०१अपक्ष               ०९           ०२शिवसेना-काँग्रेस एकत्र येणार?नगर शहरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे सध्या काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत.राष्ट्रवादीला दूर ठेवत काँग्रेसने सेनेसोबत हातमिळवणी केली व इतर छोट्या पक्षांना त्यांनी सोबत घेतले तर त्यातूनही बहुमत साकारु शकते.विखे हे फोडाफोडीचे राजकारण करु शकतात. त्यामुळे काँग्रेस व छोट्या पक्षांच्या हातीही सत्तेच्या चाव्या आहेत.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस