शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 06:44 IST

Ahilyanagar School Student Murder: शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली.

Ahilyanagar Crime: घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून आठवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेत मधल्या सुटीत दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. 

शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. त्यांचा मुलगा दहावीत शिकत होता. बुधवारी सकाळी दहावीची बोर्डाची पुरवणी परीक्षा होती. शाळा दुपारी भरली. मधल्या सुटीत मुले खेळत होती. 

काही डबा खात होती. त्यावेळी आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या पोर्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याच्या पोट व डोक्यावर चाकूने वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्याला शाळेतील शिक्षकांनी तातडीने दुचाकीवर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाला. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने दोघांची नावे घेतलेली नाहीत. 

अल्पवयीन आरोपी व त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर तो शाळेतच थांबून होता. त्याचे पालकही शाळेत आले होते. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

जु्न्या भांडणाचे कारण

मयताच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आपला मुलगा आपल्या सासूच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. त्यावरून त्या परिसरातील एक कुटुंब हे नेहमी घरी भांडणासाठी येत होते. 

‘तुमच्या मुलाला समजावून सांगा; अन्यथा आम्ही त्याला जीवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या ते देत होते. याबाबत आपल्या बहिणीने तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये २०२४ मध्ये या कुटुंबाविरोधात तक्रारही दिली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून हा खून झाला आहे.

अभ्यासात होता हुशार

मयत मुलगा हा शाळेत अभ्यासात चांगला होता. तो खेळांत ही सहभागी असायचा. तो बुद्धिबळ ही खेळायचा असे शिक्षकांनी सांगितले. घटनेनंतर शिक्षक व संस्थाचालक ही घाबरुन गेले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhilyanagarअहिल्यानगरStudentविद्यार्थीPoliceपोलिसSchoolशाळा