शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कुकडीतून पाणी सुटले

By admin | Updated: August 13, 2015 23:14 IST

अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़

अहमदनगर: अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवील अडकलेले पाणी अखेर गुरुवारी सायंकाळी कुकडीतून बाहेर पडले़ दुष्काळाने होरपळत असलेल्या दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असून,भंडारदरा धरणातून दुपारी बारा वाजेच्या सुमारास आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़कुकडी प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ५०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले़ आवर्तनाच्या आदेशाचा घोळ गुरुवारी दिवसभर सुरु होता़ सरकारी आदेश न आल्याने पाणी सुटले नाही़ निर्णय होऊन पाणी न सुटल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती़ मात्र दुपारनंतर चके्र फिरले आणि सायंकाळी कुकडीतून पाणी नगरकडे झेपावले़ विशेष म्हणजे पिण्याबरोबरच हे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ कुकडीच्या आवर्तनाचा लाभ कर्जत, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे़ दरम्यान भंडारदरा धरणातून १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सुरू करण्यात आले आहे़ सायंकाळी हे पाणी अकोला परिसरात दाखल झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ दक्षिण नगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून गेल्या २९ जुलै रोजी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती़ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री शिंदे यांनी याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कुकडीतून आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले होते़ कुकडीत ४१ टक्के पाणीसाठा असल्याने पेच निर्माण झाला होता़ त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला नाही़ दुसऱ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी महाजन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली़ त्यावर महाजन यांनी गुरुवारपासून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते़ मात्र गुरुवारी दिवसभरात जलसंपदा विभागाकडून तसे आदेश प्रशासनास प्राप्त झाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात पाणी सुटले नाही़ सायंकाळी चक्रे फिरली आणि पाणी सुटले़ कुकडीतून ५०० क्युसेकने पाणी श्रीगोंद्याकडे झेपावले असून, हे पाणी नारायणवाडी,श्रीगोंदा तालुक्यात दाखल होणार असून, या पाण्यातून सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे़ पिण्याबरोबरच शेतीसाठी पाणी सुटल्याने खरिपाला दिलासा मिळाला आहे़ (प्रतिनिधी)