शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीचा १०० वा स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

---------------- १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि देशात गांधीयुग सुरू झाले. देशभर गांधीजींविषयी प्रचंड औत्सुक्य होते. लोक त्यांच्या ...

----------------

१९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि देशात गांधीयुग सुरू झाले. देशभर गांधीजींविषयी प्रचंड औत्सुक्य होते. लोक त्यांच्या सभांना मोठी गर्दी करायचे. संगमनेरलाही स्वातंत्र्य चळवळ जोमात सुरू होती. असहकाराची चळवळ जोर धरीत होती. त्याचवेळी महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. गावोगावी यासाठी ते निधी संकलित करीत होते. लोकांना स्वदेशी कपडे, स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन करीत होते.

संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबूराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले. खुद्द गांधीजी संगमनेरला येणार म्हणून संगमनेरसह आसपासच्या गावात चैतन्य पसरले.

२१ मे १९२१ रोजी भुसावळची सभा संपवून गांधीजी संध्याकाळी नाशिकला आले आणि तिथून थेट ते संगमनेरला आले. सोबत महादेवभाई देसाई हेदेखील होते. आज त्यावेळचा इतिहास वाचताना आश्चर्य वाटते, गांधीजींची मुक्कामाची व्यवस्था सोमेश्वर मंदिरात करण्यात आली होती. यामागचे नेमके कारण कळायला आज तरी मार्ग नाही. मात्र, गांधीजींचाच कुणाच्याही घरी थांबण्याला विरोध असावा म्हणून अशी सोय करण्यात आली आली असावी. गांधीजी मंदिरात थांबले. मंदिरात काही देवतांच्या छोट्या मूर्ती होत्या. त्यातील एका मूर्तीच्या अंगावर अतिशय सुंदर असे कपडे होते; पण ते विदेशी कापडाचे होते, हे बघून गांधीजींना वाईट वाटले. त्यांनी मंदिरातून मुक्काम हलवण्याचे जाहीर केले. त्यांनी मंदिरातील मुक्काम हलवला, यामागे दुसरे असेही कारण सांगितले जाते की, इतर सर्वधर्मीय मंडळींना भेटता यावे म्हणूनही त्यांनी मुक्कामाची जागा बदलण्याचे ठरवले. त्या रात्री ते वीरचंद श्रीचंद गुजराथी यांच्या घरी मुक्कामाला थांबले. ती जागा म्हणजे संगमनेरचा सध्याचा गांधी चौक. गांधीजींना बकरीचे दूध हवे होते. म्हणून मूळच्या जोर्व्याच्या असलेल्या; परंतु संगमनेरात वास्तव्याला असणाऱ्या सीताबाई काकड यांच्याकडून हे दूध आणण्यात आले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ मे रोजी नगरपालिकेच्या प्रांगणात गांधीजींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेरबरोबरच आसपासच्या गावांतूनही मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी उपस्थित होते. या सभेत चार हजार रुपयांचा निधी जमा झाला. विशेष कौतुकाची ठरलेली गोष्ट म्हणजे गांधीजींनी सभेत लोकांना टिळक स्वराज्य फंडासाठी देणगी देण्याचे आवाहन केल्यावर सभेसाठी उपस्थित असलेल्या एक गृहिणी द्वारकाबाई मोहनीराज देशपांडे यांनी आपल्या हातातील सोन्याची एक पाटली गांधीजींकडे सुपूर्द केली. १९२१ साली स्त्रियांना सासुरवाशीण म्हणून संबोधले जायचे, अशा काळात संगमनेरला एका जाहीर सभेला महिलांनी येणे आणि या सभेत घरचे काय म्हणतील याची पर्वा न करता हातातील सोन्याची पाटली काढून देणे, ही खूप धाडसाची गोष्ट होती, असेच म्हणावे लागेल.

याच सभेत संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने गांधीजींना तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले मानपत्र देण्यात आले. या मानपत्रावर पुढील मजकूर कोरलेला आहे,

‘पूज्य महात्मा गांधी यांना मानपत्र

परमपूज्य महात्मा श्री. गांधीजी महाराज,

आमच्या या संगमनेर शहरास आपले पवित्र दर्शनाचा लाभ होण्याचे या शुभप्रसंगी, आम्ही संगमनेरचे रहिवासी आपले अत्यंत अंत:करणपूर्वक स्वागत करण्याकरता व आपण जी अमोलिक देशसेवा करीत आहात त्याबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी जमलो आहोत.

आपल्या दर्शनाने व उपदेशाने आपण ज्या महत राष्ट्रकार्याचे सर्वमान्य पुरस्कर्ते आहात. ते राष्ट्रकार्य साधनेकरिता आपण घालून दिलेला धडा मन:पूर्वक गिरविण्याचे व भरत खंडाच्या उद्धारार्थ सत्य व अहिंसा या मार्गाचे अवलंबन करण्याचे आमच्यात सामर्थ्य येवो, अशी त्या जगन्नियंत्या परमेश्वराजवळ आमची प्रार्थना आहे.’

या मानपत्रावर नागरिकांतर्फे असा उल्लेख करून शहरातील विविध समाजाच्या पाच मान्यवरांची नावे कोरलेली आहेत यात, लालसाहेब पिरजादे, गणेश सखाराम सराफ, बाबूराव अण्णाजी ठाकूर, शिवनारायण शाळीग्राम नावंदर व तुकाराम बाळाजी निऱ्हाळी यांची नावे आहेत. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून पुन्हा नगरपालिकेकडे सुपूर्द केले. महादेव शंकर शिंदे नावाच्या कारागिराने तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले हे मानपत्र सध्या नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. या सभेनंतर महात्मा गांधी कोपरगाव मार्गे येवला येथे सभेसाठी रवाना झाले. संगमनेरच्या सभेचा वृत्तांत ९ जून १९२१ च्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. गांधीजींच्या या ऐतिहासिक सभेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ही आठवण.

-डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर

(लेखक हे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष)