शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

जे पेरलं ते उगवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 2:09 AM

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला.

- विजयराज बोधनकर

शेषराव आणि मुरलीधर हे दोघेही बालमित्र, एकत्रच शिक्षण पूर्ण केलं, दोघांनाही नोकऱ्या लागल्या. मागेपुढे दोघांची लग्नं झाली, संसार बहरला. काही वर्षांतच मुलांच्या शैक्षणिक जबाबदाºया पार पडल्या. मुलांची लग्नं झाली. नातवंडं झाली. दोघेही निवृत्तीचा उंबरठा ओलांडून शांतीच्या मार्गावरून चालू लागले. पण बºयाच वर्षांत शेषरावची भेट झाली नाही म्हणून मुरलीधर अस्वस्थ होते. त्यांनी बºयाच वर्षांनी शेषरावच्या घरी फोन केला तेव्हा कळले की शेषराव आता कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहतात. तेव्हा मात्र मुरलीधर खूप अस्वस्थ झाले. शेषरावच्या मुलाकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन जिवलग मित्राला तातडीने सपत्नीक भेटायला गेले.

अचानक मुरलीधरांना वृद्धाश्रमात पाहून शेषरावचं मन भरून आलं. इतक्या काटकसरीने जीवन जगणारा आपला मित्र अशा अवस्थेत पाहून मुरलीधर यांना खूप वाईट वाटलं. हळूहळू गप्पांच्या ओघात मुरलीधर यांच्या प्रश्नाला उत्तरे मिळत गेली. शेषराव यांनी अतिलाडाने मुलं बिघडतात अशा विचारामुळे शिस्तीचा अतिरेक केला होता. कधीही त्यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नव्हती. त्यामुळे शेषराव आणि मुलांमध्ये मित्रत्वाचं नातं कधीच निर्माण न झाल्याने मुलांमध्ये बापाविषयीचा ओलावा निर्माणच झाला नव्हता.

मुलांची लग्नं झाल्यावरही तोच स्वभाव अंगी मुरला असल्याने रोज भांडणं होऊ लागली आणि शेवटी मुलांनी शेषरावना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आयुष्यभर मुलांशी जेलरसारखं वागल्यानंतर मुलांकडून वृद्धापकाळात प्रेम मिळण्याची अपेक्षा शेषराव गमावून बसले होते. मुलं ओल्या मातीच्या गोळ्यासारखी. आकार देऊ तशीच ती होतात. त्यांना प्रेम दिलं ते प्रेमच देतील. पेरू तेच उगवतं. शेषराव यांच्याबाबतीत हेच झालं होतं. याउलट मुरलीधर यांनी त्यांच्या मुलांना मित्रत्वाच्या नात्याने वाढवलं होतं. त्यांची मुलं मात्र त्यांना जीवापाड जपत होती.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक