शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कोण श्रेष्ठ? कर्म, भाग्य की बुद्धी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 5:19 AM

प्रत्येक व्यक्तीला चांगले-वाईट, चूक-बरोबरचे ज्ञान आहे. ते समजल्यानंतर काय करायचे याचे स्वातंत्र्यही आहे. म्हणूनच सर्वांचे भाग्य वेगवेगळे आहे.

- नीता ब्रह्मकुमारी‘देवा! मला चांगली बुद्धी दे’ अशी लहानपणी ईश्वराजवळ प्रार्थना करायचो. खरं तर मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा ईश्वराकडून आपल्याला विवेक आणि स्वतंत्रता मिळते. प्रत्येक व्यक्तीला चांगले-वाईट, चूक-बरोबरचे ज्ञान आहे. ते समजल्यानंतर काय करायचे याचे स्वातंत्र्यही आहे. म्हणूनच सर्वांचे भाग्य वेगवेगळे आहे.एकदा एक राजा जंगलामध्ये शिकार करण्यास गेला. काही अंतरावर त्याला काही लोकांच्या भांडणाचा आवाज ऐकायला येतो. आवाजाच्या दिशेने तो त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा तिथे तीन व्यक्ती भांडताना दिसतात. राजाला बघताच ते स्तब्ध उभे राहतात आणि गोंधळून राजालाच प्रश्न विचारतात की, ‘राजा, तुम्हीच सांगा आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण?’ राजा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, पहिले तुम्ही मला स्वत:चा परिचय तरी द्या. पहिली व्यक्ती म्हणते मी कर्म आहे, दुसरा म्हणतो मी भाग्य आहे आणि तिसरा म्हणतो मी बुद्धी आहे. राजाला पण प्रश्न पडतो. राजा उत्तर देतो की, ‘कोण श्रेष्ठ आहे हे समजण्यासाठी तुम्हाला काहीतरी करून दाखवायला लागेल.’ त्याच वेळी एक लाकूडतोड्या जाताना त्यांना दिसतो. राजा त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतो की, या लाकूडतोड्यामध्ये प्रवेश करून प्रत्येकाला आपली श्रेष्ठता दाखवावी लागेल. सात दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही किती श्रेष्ठ आहात याचे प्रमाण आपल्या सर्वांनाच मिळेल. ठीक आहे? तिघेही या गोष्टींसाठी मंजुरी देतात. पहिला नंबर ‘कर्म’ त्या लाकूडतोड्यामध्ये प्रवेश करतो. कर्म करण्याची शक्ती त्या लाकूडतोड्याकडे आहे. परंतु भाग्य आणि बुद्धी नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर्मठ होऊन तो फक्त लाकडे तोडत राहतो. सात ही दिवस तो खूप परिश्रम करतो. लाकडाचा ढीग तयार होतो, परंतु भाग्य आणि बुद्धी नसल्यामुळे लाकडांचा व्यापार करून पैसे कमवण्याच्या शक्तीचा अभाव दिसून येतो. सात दिवसांनंतरही त्याची परिस्थिती तशीच राहते. (क्रमश:)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक