शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नरकाचे दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 5:00 AM

आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेपायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत ज्यांचा आत-बाहेर परंपरेविषयी विद्रोह ठासून भरलेला होता. जे वेशधारी संतांना आपल्या शब्दांच्या काठीने सडकून काढत होते आणि सत्यशोधनाचा खरा राजमार्ग जनता जनार्दनासमोर मांडत होते, ते संत कबीर यांच्या जन्माला येण्यात, काही काळ इथे राहण्यात आणि आयुष्याचा निरोप घेण्यातही बंडखोरीचा पीळ होता. कबीरांचा ज्या काशी क्षेत्रासी जन्मजात ऋणानुबंध होता त्या काशी क्षेत्राच्या बाबतीत हजारो लोकांची अशी अंधश्रद्धा होती की येथे ज्याचा मृत्यू होतो त्याला स्वर्गप्राप्ती होते आणि येथून अगदी पाच-सहा मैलांवरच्या मगहरमध्ये ज्याचा मृत्यू होतो तो नरकाला जातो. आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली. मगहरमध्ये कबीरांचे देहावसान झाल्यानंतर म्हणे त्यांच्या पार्थिवाची फुले झाली आणि जिवंतपणी जो कबीर आमचा नाही, असे म्हणणाऱ्या हिंंदू व मुस्लिमांनी ती वाटून घेतली आणि आपआपल्या धर्माप्रमाणे विधी केले? कबीर स्वर्गाला गेले की नरकाला याबाबतीत वाद सुरू राहतील; पण साºया भारतवर्षास विचारांची फुले देणाºया कबीराने स्वर्ग आणि नरकाचे अस्तित्वच नाकारले होते. ईश्वरी शक्ती एक अक्षय पुरुष आहे बाकी सारे स्वर्ग-नरकांच्या काल्पनिक येरझाºया मारणारे आहेत, असा निर्वाणीचा इशारा देताना कबीर म्हणतात,अक्षय पुरुष एक पेड हैंनिरंजन बाकी यारत्रिदेवा शाखा भयें, पात भया संसार ॥संसाराच्या रहाटगाडग्यात पुण्याची पाऊटी सरल्यानंतर देवाधिदेवसुद्धा स्वर्ग आणि पृथ्वीच्या येरझाºया मारतात आणि आमच्यासमोर मात्र नरकाचे भयावह चित्र निर्माण करतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक