शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

स्वार्थ त्यागा, आत्मसुखाचा बोध होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:14 IST

व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर तो खरे तर या जीवसृष्टीतला सर्वात सुखी आणि समाधानी प्राणी असायला हवा.

जीवसृष्टीमध्ये मानव हा सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणून ओळखला जातो. विचार करणे, आपले मत मांडणे यांसारख्या महत्वाच्या गोष्टी फक्त मानवालाच अवगत आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. आज व्यक्तीने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. भविष्यात चंद्रावर वसाहत निर्माण करण्याचे त्याचे स्वप्नं आहे. अशक्य प्राय गोष्टींच्या शोधात मानव नेहमीच असतो. स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करून त्याने जीवन अतिशय सुखकारक करण्याचा प्रयत्न तो करू पाहत आहे.

या सगळ्या चांगल्या गोष्टी मानवाच्या बाबतीत असल्या तरी मानवा इतका क्रूर, स्वार्थी, लोभी प्राणी या जीवसृष्टीत शोधून सापडणार नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी व्यक्ती चोरी, फसवणूक, खून यांसारख्या गोष्टी सहजगत्या करत आहे. एकाच उदरातून जन्म घेतलेल्या आपल्या नात्यांना स्वार्थापाई एखादे फुल सहज चुरगाळून टाकावे, त्याप्रमाणे हत्या करण्यास मागे-पुढे पाहत नाही. इतका स्वार्थी आणि लोभीपणा फक्त मानव प्राण्यामध्ये दिसून येतो.

व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजा पूर्ण झाल्यानंतर तो खरे तर या जीवसृष्टीतला सर्वात सुखी आणि समाधानी प्राणी असायला हवा. परंतु या सर्व महत्वाच्या गरजा पूर्ण झाल्या नंतर ही व्यक्ती सुखी,समाधानी दिसत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे स्वार्थ, हव्यास. या स्वर्थामुळेच महाभारत घडले. यातूनच जन्म झाला तो भगवतगीतेचा. साक्षात श्रीकृष्णाने या संपूर्ण ब्रम्हांडाचे अमूल्य ज्ञान मानवाला दिले. परंतू ज्ञानाचे दार खुले होऊनही मानव स्वार्थाच्या अथांग समुद्रात नखशिखांत बुडून खरे सुख, समाधान याच्या शोधात आहे. जन्मदात्यांचे अनंत काळाचे उपकार,प्रेम, त्याग सर्व विसरून क्षणभंगुर स्वार्थास पाहून त्यांना घराबाहेर काढायला तो मागे-पुढे पाहत नाही. किती हा मानवाचा स्वार्थीपणा ? सतत स्वतः च्या मनाचा, स्वतःच्या सुखाचा विचार करता करता व्यक्ती स्वतःच्या मनापासून खूप दूर निघून जात आहे. 

भौतिक सुखाच्या मागे धावतांना दाग-दागिने, गाडी, जमीन- जुमला, धन-दौलत यांची किंमत त्याला जास्त वाटते. परंतू स्वतःच्या उदरातून अतोनात हाल सहन करून जन्म देणाऱ्या मातेची, स्वतःच्या सुखाचा कणभर ही विचार न करणाऱ्या अविरत कष्ट करणाऱ्या पित्याच्या जीवनाचे मूल्य त्याला काहीच वाटतं नाही. इतका स्वार्थी आजचा मानव झाला आहे. खरे सुख, समाधान यासाठी तो दिवसें दिवस स्वर्थी होत आहे. स्वार्थी या शब्दातच असे आहे की, जी काही नाती आहेत ती आर्थिक गोष्टींशी जोडली गेली आहेत. आपल्या सारखे मन इतरांचे ही आहे, त्यांना ही काही दोन शब्दांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, याचा विचार न करता. सर्व नाती तो आर्थिक पारड्यात बसवून तोलत आहे. व्यक्ती जितका स्वतःच्या मनाचा, सुखाचा, स्वार्थाचा विचार करेल. तितका तो स्वतःपासून दूर जाईल. आत्मसुख स्वार्थात नसून ते इतरांसाठी काही करण्यात आहे, त्यांना दोन शब्द प्रेमाचे बोलण्यात आहे, त्यांच्या आनंदासाठी काही करण्यात आहे. 

आज स्वार्थी कौरव अनेक भेटतात, परंतू निस्वार्थी संत तुकाराम फार कमी. वाढदिवस, भंडारे, होम-हवन या माध्यमातून जेवणावळी देणारे अनेक दिसतील. परंतू आहे त्यातून एक घास खऱ्या भुकेल्या व्यक्तीला खाऊ घालणारे थोडेच. या स्वार्थापासून व्यक्ती ज्या दिवशी दूर जाईल, त्यादिवशी त्याला खऱ्या आत्मसुखाचा बोध होईल. 

- सचिन व्ही.काळे, ९८८१८४९६६  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक