शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

मनः शांती - सुखी जीवनाचे रहस्य : भावनांना वाट द्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 19:55 IST

भावनांना नीट वाट दिली नाही तर भावनांचा उद्रेक होऊन अनर्थ घडण्याची दाट शक्यता असते..  

- डॉ. दत्ता कोहिनकर- रूपेशने वडिलांना विश्वासात न घेता परस्पर रजिस्टर्ड प्रेमविवाह केल्याने वडिलांबरोबर त्याचे कडाक्याचे भांडण होऊन त्याला घर सोडावे लागले होते. पाच वर्षे झाली होती. तो वडिलांशी बोलत नव्हता. काही लग्न समारंभात त्याला वडिलांना नमस्कार करून बोलावेसे वाटायचे पण त्या भावना तो अहंकारामुळे दाबून ठेवून वडिलांपासून दूर जात असे. विपश्यनेच्या, ध्यानाच्या शिबिरात त्याला वडिलांची खूप आठवण आली व वडिलांनी त्याच्यासाठी उचललेल्या कष्टांनी त्याचे मन भरून आले, अपराधीपणाची भावना त्याने आचार्यांजवळ व्यक्त केली. शिबिर संपल्यानंतर आचार्यांनी त्याला वडिलांकडे जाऊन माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमचा खूप ॠणी आहे, असा भाव व्यक्त करावयास सांगितला. शेवटी शिबीर संपल्यावर तो डायरेक्ट वडिलांकडे गेला. बेल मारल्यानंतर वडिलांनीच दार उघडले. तो म्हणाला, बाबा - माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमचा ॠणी आहे. बाबांनी हे ऐकताच त्याला मिठी मारली दोघेही अश्रू गाळू लागले. त्यादिवशी रूपेशला खूप ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. एकच आठवडयात वडिलांना हृदयविकाराने मृत्यूला सामोरे जावे लागले. दोन वर्षांपूर्वीच वडिलांना एक अ‍ॅटॅक आला होता. पण रूपेशला त्यांनी कळवलं नव्हते. मित्रांनो..रूपेश जर वडिलांना भेटून भावना व्यक्त करू शकला नसता तर त्याला अपराधीपणाच्या भावनेने आयुष्यभर छळले असते. म्हणून मनातील भावनांना जाणून योग्य वेळी त्यांना वाट मोकळी करून दिल्याने मनावरचे ओझे खूप हलके होते.  भावनांना नीट वाट दिली नाही तर भावनांचा उद्रेक होऊन अनर्थ घडण्याची दाट शक्यता असते..  भावनांचा उद्रेक झाला त्यांचे दमन झाले की मनुष्य क्रुरतेकडे व नैराश्याकडे झुकतो. अलिकडे ज्या कुटूंबात जास्त कलह - व्यसन - भांडणे आहेत किंवा आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे किंवा मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले गेले आहे. अशा मुलांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्यांच्या हातून हिंसक घटना घडताना दिसतात. नातवाने आजीचा खून करणे, नकार दिला म्हणून मुलीवर अ‍ॅसिड फेकणे, चाकूहल्ला करणे हे यातीलच प्रकार होत. भावनांचा समतोल ढळला की  निद्रानाश, रक्तदाब, अल्सर यासारखे अनेक आजार शरीरात बळावतात व ताणतणाव वाढतो. म्हणून आपल्या मनातील भावना संबंधित लोकांसमोर वेळेनुसार व्यक्त करा. फक्त  व्यक्त  करताना त्यामुळे आपले व समोरच्या व्यक्तीचे नुकसान होणार नाही व सामाजिक शांतता, सुव्यवस्था टिकून राहील व संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच आपली प्रज्ञा जागवा. व्यक्त करता न येण्यासारख्या भावना कागदांवर लिहून काढा व न वाचता तो फाडून टाका. भावनांना वाट देण्यासाठी योग्य ते माध्यम शोधा, व्यायाम करा, खेळ खेळा, गप्पा मारा, विनोद करा, नाचा - बागडा, मोठयाने गाणी म्हणा, सहलीला जा, समोरच्याचे ऐकून घ्या, त्याला सहानुभूती दया. अनेक मित्र-मैत्रिणी गोळा करा, समोरच्याच्या भावनांचा आदर करा, दु:ख झाले तर रडून घ्या, राग आला तर घरातील उशीवर (पिलो) राग शांत होईपर्यंत गुद्दे मारा. योगासने करा, ध्यान करा व आनंदाने जीवन जगण्यासाठी आवश्यक त्यावेळी बिनधास्त व्यक्त होऊन भावनांना वाट द्या. यातच सुखी जीवनाचे रहस्य दडलेले आहे.

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधनाAdhyatmikआध्यात्मिक