शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 3:42 AM

सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय(भा.पो.से.)सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते. कारागृहात गेल्यानंतर त्यास कैदी किंवा बंदी म्हटले जाते. कैदेतून बाहेर आल्यानंतर काही लोकांमध्ये सुधारणा घडून येते तर काही लोक पुन्हा अपराध करतात व पुन्हा कैदी बनून कारागृहात दाखल होतात. कैद्यांचेसुद्धा अनेक प्रकार असतात. काही कैद्यांचे अपराध छोटे तर काही कैद्यांचे अपराध गंभीर असतात. कारागृहात गेल्यानंतर जर एखाद्या कैद्याची वागणूक चांगली नसेल तर कारागृह नियमानुसार त्यास तेथेही शिक्षा दिली जाते व आवश्यकतेनुसार त्यास अतिसुरक्षा विभागात बंद करून विभक्त कोठडीत ठेवले जाते. कारागृह ही अशी जागा आहे, जेथून कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बाहेर पडू शकत नाही. एकतर न्यायालय त्याची सुटका करते किंवा त्याची शिक्षा संपल्यानंतर ती व्यक्ती बाहेर येते.या जगात राहणारे अनेक लोक कारागृहातील कैद्यांसारखे जीवन जगत असतात. विशुद्ध चेतनेच्या स्तरातून स्वतंत्र असूनसुद्धा आपण आपल्या मनोविकारात कैद असतो. शास्त्रात याच मनोविकारांना षड्दोषांच्या रूपात वर्णित केलेले आहे. हे षड्दोष म्हणजेच काम, क्र ोध,लोभ, मोह, मद व मत्सर. कामाच्या अधिकतेमुळे व्यक्ती ही कामाच्या अधीन होते व ती व्यक्ती आपले स्वातंत्र्य गमावून बसते. अशाचप्रकारे क्र ोध, मोह, मद व मत्सर आपल्याला वेगळा विचार करू देत नाही व आपण भावनेच्या आहारी जाऊन कैदी जीवन जगायला लागतो.हे दोष व विकार इतके मजबूत असतात की त्याच्या प्रभावातून मुक्त होणे मानवासाठी अत्यंत कठीण असते. गुरू किंवा संत हे न्यायालयासारखे आहेत, जे आपल्याला या विकारांच्या कैदेतून मुक्त करतात. यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान सर्वोत्तम आहे. गुरू अनेक प्रकारच्या विधीचा वापर करून लोकांना मनोविकारातून मुक्त करतात. भारतीय अध्यात्मशास्त्रात या विधींना ज्ञान, भक्ती किंवा कर्म या नावाने ओळखले जाते. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार व स्वभाव वेगवेगळे असतात. गुरूसुद्धा अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे मार्ग दाखवून मुक्त करतो. मुक्ती हा शब्दच भारतीय अध्यात्म शास्त्रात एक महत्त्वाचा शब्द आहे. या मनोविकाराच्या अनुचित प्रभावातून पूर्णपणे मुक्त होणे म्हणजेच त्या परमतत्त्वाला प्राप्त करणे होय.

टॅग्स :jailतुरुंग