शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सागरा सम बनू या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 2:10 AM

आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का?

- नीता ब्रह्माकुमारीकाही दिवसांपूर्वी मी ओडिशा येथील चिल्का लेकला गेले होते. थोड्या अंतरावर संगमलाही गेले. जेव्हा तिथं बंगालचा उपसागर पाहिला आणि मनात आलं की खरंच मनुष्याला सागरासमान बनायला हवं. तिकडच्या एका मासेमाऱ्यानं आम्हाला मोती, पोवळं, नीलम, पुखराज, पाचू अशी अनेक रत्नं काढून दाखवली. ते दाखवताना त्यांचं महत्त्वही तो सांगत होता. ज्योतिषशास्त्रात या रत्नांचं खूप महत्त्व आहे. आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का? पृथ्वीतलावर राहणाºया प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आज अनेकानेक अडचणी, समस्या येतात. खरं तर बाहेरच्या परिस्थितीचं रूप जे पण आहे ते आपल्या आंतरिक अवस्थेचं प्रमाण आहे. अंतर्विश्वामध्ये जे चाललं आहे तेच बाह्यविश्वात होत आहे. जसं सागराचं बाह्यरूप पाहिलं तर तो कधीच शांत नसतो. पण त्याच्या तळाशी असीम शांती असते. मनुष्याचं जीवनही तसंच आहे. बाहेरचं रूप नेहमीच नवनवीन परिस्थितीच्या घेरात अडकलेलं दिसतं. पण त्या सर्व समस्यांची उत्तरं आपल्या अंतर्विश्वामध्येच आहेत. समुद्राच्या तळाशी अनेकानेक अमूल्य रत्नं मिळतात, त्याचप्रमाणे मनाच्या तळाशी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळत जातात. अनेक रहस्यं उलगडली जातात. बंगालच्या उपमहासागराचं विशाल रूप जेव्हा बघत होते, तेव्हा त्याचं ते शुद्ध, स्वच्छ निळं पाणी दूरपर्यंत दिसत होतं. परंतु जेव्हा ते पाणी उफाळून किनाºयाजवळ यायचं तेव्हा त्याचा रंग बदललेला असे. कधी कधी आपलंही असच होतं. खूप वेळा आपण स्वत:ला समजावतो, आज राग करायचा नाही. आज कुणाला दु:ख द्यायचं नाही. पण अशी काही परिस्थिती आपल्यासमोर येते की, आपण चांगलं ठरवलेलं असलं तरी आपल्याकडून परत परत त्याच चुका होतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक