शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: आपणही बदलुया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 02:52 IST

गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का?

विजयराज बोधनकरगणपती बाप्पा गेले. आनंद सोेहळा पार पडला, दहा दिवस भक्तीचे गेलेत, समाज एकत्र आला, मंडपे उभारलीत, रोषणाई केली, भव्य मूर्ती पुजल्या गेल्यात, दान पेट्या भरल्यात, पूजा साहित्य विक्रेते सुखावलेत, व्यापार बहरला, अख्खा समाज उत्साहाने आनंदून गेला. पण यातून खरे फलित हाती लागले का की फक्त उत्सव साजरे झालेत? काही गणेश मंडळाचा गणपती मंडपात झाकून ठेवल्यामुळे व महान अभिनेते, अभिनेत्री दर्शनाला आल्यामुळे मोठ्या रांगा लागल्यात, मीडियाने सतत सेलिब्रटींचा मारा केल्यामुळे भक्तगण त्या मृगजळामागे धावू लागलेत, जो गणपती मीडियावर झळकतो तो पावणारा देव असा शिक्कामोर्तब भक्तगण करत गेले आणि रांग वाढतच गेली. रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यावर खरंच श्री गणेश पावतो का? घरात आणलेला गणपती हा नवसाला न पावता सार्वजनिक गणपती नवसाला पावणारा गणपती असतो असं कुणी सिद्ध करेल का?

गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का? तर अजिबात नाही. देवापुढे पैसे ठेवण्याची आपली परंपरा आहे, कारण मंदिरातला होणारा खर्च सर्व भक्तांनी स्वेच्छेने उचलावा यासाठी आपण पेटीत पैसे टाकतो.. पण गणेश उत्सवातला गणपती हा मंदिरातला गणपती नसतो तर मंडपातल्या गणपतीला कोट्यवधींच्या मालमत्तेची खरंच गरज असते का?

समाज आज वैचारिकदृष्टया फार पुढे गेला आहे. पण, विज्ञानाचं युग येऊनही वैचारिकता अजूनही का हवी तशी फुलत नाही, भक्तीचा अर्थ कर्माशी का लावला जात नाही? देवत्व हे कर्मातून फुलत असतं... हा भाव ज्या दिवशी उमटेल त्यादिवशी श्री गणेशाच्या अध्यात्माने सर्वत्र उजळून निघेल, गणपतीइतकी वैचारिकता उंच झाली तरच हे शक्य आहे. उद्या गणेश मूर्तीची जी अवस्था आपण पाहू त्यावरून आपण बदलले पाहिजे हे आपल्या ध्यानी येईल...