शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आनंद तरंग: आपणही बदलुया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 02:52 IST

गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का?

विजयराज बोधनकरगणपती बाप्पा गेले. आनंद सोेहळा पार पडला, दहा दिवस भक्तीचे गेलेत, समाज एकत्र आला, मंडपे उभारलीत, रोषणाई केली, भव्य मूर्ती पुजल्या गेल्यात, दान पेट्या भरल्यात, पूजा साहित्य विक्रेते सुखावलेत, व्यापार बहरला, अख्खा समाज उत्साहाने आनंदून गेला. पण यातून खरे फलित हाती लागले का की फक्त उत्सव साजरे झालेत? काही गणेश मंडळाचा गणपती मंडपात झाकून ठेवल्यामुळे व महान अभिनेते, अभिनेत्री दर्शनाला आल्यामुळे मोठ्या रांगा लागल्यात, मीडियाने सतत सेलिब्रटींचा मारा केल्यामुळे भक्तगण त्या मृगजळामागे धावू लागलेत, जो गणपती मीडियावर झळकतो तो पावणारा देव असा शिक्कामोर्तब भक्तगण करत गेले आणि रांग वाढतच गेली. रांगेत उभं राहून दर्शन घेतल्यावर खरंच श्री गणेश पावतो का? घरात आणलेला गणपती हा नवसाला न पावता सार्वजनिक गणपती नवसाला पावणारा गणपती असतो असं कुणी सिद्ध करेल का?

गणपती भक्ताला दानपेटीत दक्षणा, दागिने टाकायला सांगतो का? तर अजिबात नाही. देवापुढे पैसे ठेवण्याची आपली परंपरा आहे, कारण मंदिरातला होणारा खर्च सर्व भक्तांनी स्वेच्छेने उचलावा यासाठी आपण पेटीत पैसे टाकतो.. पण गणेश उत्सवातला गणपती हा मंदिरातला गणपती नसतो तर मंडपातल्या गणपतीला कोट्यवधींच्या मालमत्तेची खरंच गरज असते का?

समाज आज वैचारिकदृष्टया फार पुढे गेला आहे. पण, विज्ञानाचं युग येऊनही वैचारिकता अजूनही का हवी तशी फुलत नाही, भक्तीचा अर्थ कर्माशी का लावला जात नाही? देवत्व हे कर्मातून फुलत असतं... हा भाव ज्या दिवशी उमटेल त्यादिवशी श्री गणेशाच्या अध्यात्माने सर्वत्र उजळून निघेल, गणपतीइतकी वैचारिकता उंच झाली तरच हे शक्य आहे. उद्या गणेश मूर्तीची जी अवस्था आपण पाहू त्यावरून आपण बदलले पाहिजे हे आपल्या ध्यानी येईल...